शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ओपनस्पेस बनले हागणदारीचे मुख्यालय

By admin | Updated: February 7, 2015 23:22 IST

संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड

गडचांदूर: संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड हागणदारीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे प्रौढांना खुल्या वातावरणात फिरण्यासाठी किंवा छोट्या मुलांना खेळण्यासाठी एकही मोकळी जागा उरली नाही. गडचांदूरात पाच ते सहा मोकळ भुखंड आहेत. याठिकाणी आजपर्यंत ग्रामपंचायत असताना कोणत्याही प्रकारचे सौंदर्यीकरण करण्यात आले नाही. नगर परिषद प्रशासनसुद्धा कोणताही पुढाकार घेत असल्याचे दिसत नाही. एरवी नागरिक प्लॉट विकत घेताना ओपनस्पेसलगतच्या प्लॉटची मागणी करतात. मात्र गडचांदुरात अगदी याउलट चित्र आहे. कोणीही अशा ओपनस्पेसजवळ राहणे पसंत करीत नाही. कारण गडचांदुरातील निम्म्या ओपनस्पेसवर हागणदारीच आहे. सुरुवातीलाच विकसीत ले-आऊट न टाकल्यामुळे ओपनस्पेसची अशी दुरावस्था झाली आहे. कोणत्याही प्रकारचे सौंदर्याकरण करण्यात आलेले नाही.प्रभाग दोनमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव असलेल्या वॉर्डात दाटवस्तीच्या मध्यभागी मोठे ओपनस्पेस आहे. या ओपनस्पेसमुळे येथील नागरिकांना दुर्गंधी व शौचास बसणाऱ्यांचा फार त्रास आहे. त्यांना कुणी टोकल्यास त्याचे परिणाम फार वाईट येत असल्याचे अनुभव येथील नागरिक सांगतात. या ओपनस्पेसला पूर्णपणे हागणदारी बनविले आहे.शासनाकडून शौचालय बांधण्याकरिता कर्ज मिळते. मात्र त्याचा लाभ घेण्याची इच्छा लोकांमध्ये दिसत नाही. नगरपालिकासुद्धा त्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यात अपयशी ठरली आहे. इतर गोष्टींवर अवाढव्य खर्च करणारे लोक शौचालय बांधण्याकरिता मात्र हयगय करताना दिसतात. प्रभाग दोनमधील ओपनस्पेसनवर बाहेरील वॉर्डातील महिला येऊन उघड्यावर शौचास बसतात. एवढेच नाही तर इथे इतरत्र मृत जनावरेसुद्धा आणून टाकली जातात. त्यामुळे या परिसरात सतत दुर्गंधीचे वातावरण असते.पावसाळ्यात तर विविध ओपनस्पेसवर विदारक परिस्थिती असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डातील नागरिकांनी ओपनस्पेसचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून वारंवार निवेदने दिली. परंतु यावर नगरपरिषदेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यात हागणदारी मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. या चळवळीच्या यशस्वीतेसाठी अनेक नगर परिषदांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले असताना गडचांदूरमध्ये मात्र या चळवळीला खीळ बसत आहे. ईच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची गडचांदुरात कमतरता आहे. स्थानिक पातळीवर असलेले राजकीय मतभेद, वैयक्तिक मतभेद व अन्य कारणांमुळे तालुक्यातील एकमेव नगरपरिषद व क्रमांक एकची लोकसंख्या असलेले गडचांदूर शहर हागणदारी मुक्त अभियानापासून कोसो दूर आहे. ओपनस्पेसचा योग्य उपयोग नगरपरिषदेने करायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायतीने योग्य धोरण न आखल्यामुळे अनेक ओपनस्पेस गोदरीमय झाले आहे. (शहर प्रतिनिधी)