शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

शेतकरी शास्त्रज्ञ बनला तरच शेती समृद्ध

By admin | Updated: June 2, 2016 02:39 IST

निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे.

अमृत देशमुख यांचे प्रतिपादन : कापूस शेतकरी मेळावाचिमूर : निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाने शेतकरी शेती करू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्याच शेतीच्या माध्यमातून शेतीचे संशोधन करुन शास्त्रज्ञ झाले पाहिजे. तरच शेती समृद्ध होईल, असे मत चिमूर कॉटन इंडस्ट्रीच्या वतीने शेतकरी भवनात आयोजित कापूस शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शनात अमृत पॅटर्नचे जनक अमृत देशमुख यांनी व्यक्त केले.कापूस शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम मालोदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक आॅफ महाराष्ट्र चंद्रपूरचे झोनल मॅनेजर संजय हिरेमठ, चिमूर नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, चिमूर सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष दादा दहीकर, कृउबा समितीचे उपसभापती गोपाल बलबुवा, नगरसेविका छाया कंचर्लावार, नगरसेविका सतिश जाधव, चिमूर कॉटन इंडस्ट्रीचे संचालक सचिन खाले, कृषी मार्गदर्शक अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख, डॉ. प्रशांत राखोंडे, कृषी मार्गदर्शक एम.एस. वरभे कार्यक्रमाला उपस्थित होते.शेतकऱ्यांना मार्गर्शदन करताना अमृत देशमुख पुढे म्हणाले, जमिनीची मशागत करण्यासाठी आज शेतकरी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तरी टॅक्टरच्या साहयाने बरेच शेतकरी ऐन पेरणीच्या वेळी नागरणी करतात. ही चुकीची पद्धत असून जमिनीची मशागत खरीप रबी पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात करावी. रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर करावा. रासायनिक खताने शेती काही दिवसांनी बजर होते व शेती पिकणार नाही. शेणखत नसून जिवाणूचे खाद्य आहे म्हणून रासायनिक खत व्यवस्थापक, सूर्य प्रकाश, पाणी व्यवस्थापक जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच शेणखताची प्रक्रिया महत्वाची आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक बकाराम मालोदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या परिसरात शेतकऱ्यांच्याच मुलांनी जिनिंग उभी करुन शेतकऱ्यांसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध करुन तसेच शेतकीहीताचे कार्यक्रम राबविला जात आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस बाजार समितीतील सेसच्या माध्यमातून बाजार समिती चिमूरच्या उत्पन्नात भर टाकत आहे. जिनिंगमुळे रोजगार व परिसरातील उलाढाल वाढीकरिता मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. या कापूस शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)