शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
₹6700000 चं टॉयलेट, ₹76000 चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
3
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
4
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
5
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
6
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
7
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
8
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
9
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
10
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
11
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
12
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
13
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
14
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
15
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
16
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
17
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
18
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
19
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
20
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी शास्त्रज्ञ बनला तरच शेती समृद्ध

By admin | Updated: June 2, 2016 02:39 IST

निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे.

अमृत देशमुख यांचे प्रतिपादन : कापूस शेतकरी मेळावाचिमूर : निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाने शेतकरी शेती करू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्याच शेतीच्या माध्यमातून शेतीचे संशोधन करुन शास्त्रज्ञ झाले पाहिजे. तरच शेती समृद्ध होईल, असे मत चिमूर कॉटन इंडस्ट्रीच्या वतीने शेतकरी भवनात आयोजित कापूस शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शनात अमृत पॅटर्नचे जनक अमृत देशमुख यांनी व्यक्त केले.कापूस शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम मालोदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक आॅफ महाराष्ट्र चंद्रपूरचे झोनल मॅनेजर संजय हिरेमठ, चिमूर नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, चिमूर सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष दादा दहीकर, कृउबा समितीचे उपसभापती गोपाल बलबुवा, नगरसेविका छाया कंचर्लावार, नगरसेविका सतिश जाधव, चिमूर कॉटन इंडस्ट्रीचे संचालक सचिन खाले, कृषी मार्गदर्शक अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख, डॉ. प्रशांत राखोंडे, कृषी मार्गदर्शक एम.एस. वरभे कार्यक्रमाला उपस्थित होते.शेतकऱ्यांना मार्गर्शदन करताना अमृत देशमुख पुढे म्हणाले, जमिनीची मशागत करण्यासाठी आज शेतकरी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तरी टॅक्टरच्या साहयाने बरेच शेतकरी ऐन पेरणीच्या वेळी नागरणी करतात. ही चुकीची पद्धत असून जमिनीची मशागत खरीप रबी पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात करावी. रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर करावा. रासायनिक खताने शेती काही दिवसांनी बजर होते व शेती पिकणार नाही. शेणखत नसून जिवाणूचे खाद्य आहे म्हणून रासायनिक खत व्यवस्थापक, सूर्य प्रकाश, पाणी व्यवस्थापक जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच शेणखताची प्रक्रिया महत्वाची आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक बकाराम मालोदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या परिसरात शेतकऱ्यांच्याच मुलांनी जिनिंग उभी करुन शेतकऱ्यांसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध करुन तसेच शेतकीहीताचे कार्यक्रम राबविला जात आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस बाजार समितीतील सेसच्या माध्यमातून बाजार समिती चिमूरच्या उत्पन्नात भर टाकत आहे. जिनिंगमुळे रोजगार व परिसरातील उलाढाल वाढीकरिता मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. या कापूस शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)