शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

चंद्रपूर जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पात केवळ २८ टक्केच पाणीसाठा!

By राजेश भोजेकर | Updated: April 18, 2023 16:07 IST

चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत

चंद्रपूर : यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

लभनसराड जलाशयात केवळ २४ टक्के पाणीसाठा आहे. नालेश्‍वर ३७ टक्के, चारगाव ३३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच असोलामेंढा ८१.३७, घोराझरी १९, अमलनाला ३०, पकडीगुड्डम ३१, डोंगरगाव ६५, इराई ५३.१७ टक्के पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात या धरणांची हीच अवस्था अशीच राहिल्यास येत्या काळात नागरिकांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते. धरणांची स्थिती बिकट असतानाही जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. उद्योगांना पाणी मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोपही होत आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला मात्र त्याचा जलाशयांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

यंदाचा पाऊस पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याचे संकट ओढवणार नाही, असा अंदाज होता. मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या अहवालानुसार एक जलाशय रिकामा झाला असून दुसऱ्याची स्थिती गंभीर होत आहे. या जलाशयांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे येत्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या धरणात केवळ ५३.१७ टक्के पाणीसाठा आहे. अशा स्थितीत शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

इरई धरणाची पाणी साठवण क्षमता १७२.१५ (दलघमी) आहे. मात्र, आजमितीस धरणात केवळ ९१.५३ (दलघमी) पाणीसाठा आहे. जे ५३.१७ टक्के असल्याचे सांगण्यात आले. इराई धरणातून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र आणि शहराला पाणीपुरवठा होतो, त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर