शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पात केवळ २८ टक्केच पाणीसाठा!

By राजेश भोजेकर | Updated: April 18, 2023 16:07 IST

चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत

चंद्रपूर : यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

लभनसराड जलाशयात केवळ २४ टक्के पाणीसाठा आहे. नालेश्‍वर ३७ टक्के, चारगाव ३३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच असोलामेंढा ८१.३७, घोराझरी १९, अमलनाला ३०, पकडीगुड्डम ३१, डोंगरगाव ६५, इराई ५३.१७ टक्के पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात या धरणांची हीच अवस्था अशीच राहिल्यास येत्या काळात नागरिकांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते. धरणांची स्थिती बिकट असतानाही जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. उद्योगांना पाणी मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोपही होत आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला मात्र त्याचा जलाशयांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

यंदाचा पाऊस पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याचे संकट ओढवणार नाही, असा अंदाज होता. मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या अहवालानुसार एक जलाशय रिकामा झाला असून दुसऱ्याची स्थिती गंभीर होत आहे. या जलाशयांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे येत्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या धरणात केवळ ५३.१७ टक्के पाणीसाठा आहे. अशा स्थितीत शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

इरई धरणाची पाणी साठवण क्षमता १७२.१५ (दलघमी) आहे. मात्र, आजमितीस धरणात केवळ ९१.५३ (दलघमी) पाणीसाठा आहे. जे ५३.१७ टक्के असल्याचे सांगण्यात आले. इराई धरणातून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र आणि शहराला पाणीपुरवठा होतो, त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर