शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 5:00 AM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुर‌ळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.  विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना नाहक त्रास : पॅसेंजर बंदच, विशेष गाड्यांचाही थांबा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. मात्र या गाड्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुर‌ळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे येथील प्र‌वाशांना वर्धा येथून विशेष रेल्वे पकडावी लागत आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा; नाही तर पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करीत आहेत.

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?कोरोना संकटापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे थांबत होत्या.  त्यातील काही मोजक्याच ठिकाणी आता रेल्वे थांबत आहे. विशेष म्हणजे, सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

कोरोना संकटानंतर पॅसेंजर तसेच इतर एक्स्प्रेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची  लूट सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या स्पेशल ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबवाव्यात किंवा पॅसेंजर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

कोरोना संकटामुळे नियमित रेल्वे सेवा बंद आहे. यातील काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवाग्राम, आनंदवन या रेल्वे सुरू करून दिलासा द्यावा.- श्रीकांत खडसे, चंद्रपूर

कोरोना संकटापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू होती. त्यामुळे चंद्रपूर तसेच इतर ठिकाणाहून मुंबईला जाणे सोपे होते. मात्र आता ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा येथील स्टेशनवरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.-अनुप खुटेमाटे, भद्रावती

 

टॅग्स :railwayरेल्वे