शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

..मग काही तासातच कसा आला होता ‘त्या’ वाघाला मारण्याचा आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:23 IST

जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरणतेव्हा एनटीसीएची नियमावली नव्हती?

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच दिवसांपासून उपचाराविना विव्हळत असलेल्या ‘येडा अण्णा’ या वाघावर उपचाराकरिता वनविभागाला नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ची नियमावली आडवी आली. मग जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल उपचाराविना तडफडत मरण पावलेल्या ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील हळदा, पद्मापूर, (भूज), बल्लारपूर व परिसरातील गाव परिसरात वाघाने धूमाकूळ घातला होता. त्या वाघाने पाच जणांचा बळी घेतला होता. यामुळे संबंधित गावकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन करून वनविभागाला जेरीस आणले होते. गावकऱ्यांनी कायदा हातात घेतला म्हणून ४९ आंदोलनकर्त्या गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक केली होती.या घटनेमुळे विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पीडित गावकºयांनी २३ जून २०१७ रोजी चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या कार्यालय परिसरात ठिय्या मांडला. नंतर शेळके यांना त्यांच्या कक्षात घेराव घातला होता. वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका आ. वडेट्टीवार यांनी त्यावेळी घेतली होती. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना वाघाला ठार मारण्याचे आदेश द्यावे लागले होते. हे आदेश प्राप्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या कक्षात बसूनच पाठपुरावा केला होता हे विशेष.एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे आदेश मिळविण्यासाठीही समिती गठण करणे बंधनकारक होते. या समितीच्या अहवालानुसारच वाघाला ठार करण्याचे आदेश देता येतात. मग काही तासातच समिती गठित झाली. समितीने तसा अहवाल दिला आणि वाघाला ठार करण्याचे आदेश मिळविले, असे असेल, तर ही किमया वनविभागाने वाघावर उपचार करण्यासाठी साधायला हवी होती. ही बाब ताडोबाच्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी असती. ‘येडा अण्णाची’ प्रकृती नाजूक होती. वनविभागाने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हा सकारात्मक संदेश यातून गेला असता, हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाघाला मारण्यासाठी नव्हे, तर वाचविण्यासाठी नियमावली?वाघाने एखाद्या परिसरात धुमाकूळ घातला तर त्याला लगेच ठार करण्याचे आदेश दिले जात नाही. वाघाने गावात व गाव परिसरात सात जणांचा बळी घेतल्यानंतरच एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी जाणकार वन्यजीवप्रेमींची माहिती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात ‘त्या’ वाघाने धूमाकूळ घातला होता हे खरे असले तरी वाघाचे हल्ले हे जंगल परिसरातील होते. असे असतानाही चंद्रपूर मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला ठार करण्याचे आदेश एका दिवसातच नव्हे, तर काही तासांतच मिळविले होते. असाच आदेश वाघाच्या उपचारासाठीही मिळविला असता, तर वनविभागावर टीकेची झोड उठली नसती.

टॅग्स :Tigerवाघ