शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

..मग काही तासातच कसा आला होता ‘त्या’ वाघाला मारण्याचा आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:23 IST

जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरणतेव्हा एनटीसीएची नियमावली नव्हती?

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच दिवसांपासून उपचाराविना विव्हळत असलेल्या ‘येडा अण्णा’ या वाघावर उपचाराकरिता वनविभागाला नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ची नियमावली आडवी आली. मग जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल उपचाराविना तडफडत मरण पावलेल्या ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील हळदा, पद्मापूर, (भूज), बल्लारपूर व परिसरातील गाव परिसरात वाघाने धूमाकूळ घातला होता. त्या वाघाने पाच जणांचा बळी घेतला होता. यामुळे संबंधित गावकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन करून वनविभागाला जेरीस आणले होते. गावकऱ्यांनी कायदा हातात घेतला म्हणून ४९ आंदोलनकर्त्या गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक केली होती.या घटनेमुळे विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पीडित गावकºयांनी २३ जून २०१७ रोजी चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या कार्यालय परिसरात ठिय्या मांडला. नंतर शेळके यांना त्यांच्या कक्षात घेराव घातला होता. वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका आ. वडेट्टीवार यांनी त्यावेळी घेतली होती. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना वाघाला ठार मारण्याचे आदेश द्यावे लागले होते. हे आदेश प्राप्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या कक्षात बसूनच पाठपुरावा केला होता हे विशेष.एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे आदेश मिळविण्यासाठीही समिती गठण करणे बंधनकारक होते. या समितीच्या अहवालानुसारच वाघाला ठार करण्याचे आदेश देता येतात. मग काही तासातच समिती गठित झाली. समितीने तसा अहवाल दिला आणि वाघाला ठार करण्याचे आदेश मिळविले, असे असेल, तर ही किमया वनविभागाने वाघावर उपचार करण्यासाठी साधायला हवी होती. ही बाब ताडोबाच्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी असती. ‘येडा अण्णाची’ प्रकृती नाजूक होती. वनविभागाने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हा सकारात्मक संदेश यातून गेला असता, हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाघाला मारण्यासाठी नव्हे, तर वाचविण्यासाठी नियमावली?वाघाने एखाद्या परिसरात धुमाकूळ घातला तर त्याला लगेच ठार करण्याचे आदेश दिले जात नाही. वाघाने गावात व गाव परिसरात सात जणांचा बळी घेतल्यानंतरच एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी जाणकार वन्यजीवप्रेमींची माहिती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात ‘त्या’ वाघाने धूमाकूळ घातला होता हे खरे असले तरी वाघाचे हल्ले हे जंगल परिसरातील होते. असे असतानाही चंद्रपूर मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला ठार करण्याचे आदेश एका दिवसातच नव्हे, तर काही तासांतच मिळविले होते. असाच आदेश वाघाच्या उपचारासाठीही मिळविला असता, तर वनविभागावर टीकेची झोड उठली नसती.

टॅग्स :Tigerवाघ