शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

..मग काही तासातच कसा आला होता ‘त्या’ वाघाला मारण्याचा आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:23 IST

जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरणतेव्हा एनटीसीएची नियमावली नव्हती?

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच दिवसांपासून उपचाराविना विव्हळत असलेल्या ‘येडा अण्णा’ या वाघावर उपचाराकरिता वनविभागाला नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ची नियमावली आडवी आली. मग जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल उपचाराविना तडफडत मरण पावलेल्या ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील हळदा, पद्मापूर, (भूज), बल्लारपूर व परिसरातील गाव परिसरात वाघाने धूमाकूळ घातला होता. त्या वाघाने पाच जणांचा बळी घेतला होता. यामुळे संबंधित गावकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन करून वनविभागाला जेरीस आणले होते. गावकऱ्यांनी कायदा हातात घेतला म्हणून ४९ आंदोलनकर्त्या गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक केली होती.या घटनेमुळे विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पीडित गावकºयांनी २३ जून २०१७ रोजी चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या कार्यालय परिसरात ठिय्या मांडला. नंतर शेळके यांना त्यांच्या कक्षात घेराव घातला होता. वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका आ. वडेट्टीवार यांनी त्यावेळी घेतली होती. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना वाघाला ठार मारण्याचे आदेश द्यावे लागले होते. हे आदेश प्राप्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या कक्षात बसूनच पाठपुरावा केला होता हे विशेष.एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे आदेश मिळविण्यासाठीही समिती गठण करणे बंधनकारक होते. या समितीच्या अहवालानुसारच वाघाला ठार करण्याचे आदेश देता येतात. मग काही तासातच समिती गठित झाली. समितीने तसा अहवाल दिला आणि वाघाला ठार करण्याचे आदेश मिळविले, असे असेल, तर ही किमया वनविभागाने वाघावर उपचार करण्यासाठी साधायला हवी होती. ही बाब ताडोबाच्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी असती. ‘येडा अण्णाची’ प्रकृती नाजूक होती. वनविभागाने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हा सकारात्मक संदेश यातून गेला असता, हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाघाला मारण्यासाठी नव्हे, तर वाचविण्यासाठी नियमावली?वाघाने एखाद्या परिसरात धुमाकूळ घातला तर त्याला लगेच ठार करण्याचे आदेश दिले जात नाही. वाघाने गावात व गाव परिसरात सात जणांचा बळी घेतल्यानंतरच एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी जाणकार वन्यजीवप्रेमींची माहिती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात ‘त्या’ वाघाने धूमाकूळ घातला होता हे खरे असले तरी वाघाचे हल्ले हे जंगल परिसरातील होते. असे असतानाही चंद्रपूर मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला ठार करण्याचे आदेश एका दिवसातच नव्हे, तर काही तासांतच मिळविले होते. असाच आदेश वाघाच्या उपचारासाठीही मिळविला असता, तर वनविभागावर टीकेची झोड उठली नसती.

टॅग्स :Tigerवाघ