शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

..मग काही तासातच कसा आला होता ‘त्या’ वाघाला मारण्याचा आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:23 IST

जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरणतेव्हा एनटीसीएची नियमावली नव्हती?

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच दिवसांपासून उपचाराविना विव्हळत असलेल्या ‘येडा अण्णा’ या वाघावर उपचाराकरिता वनविभागाला नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ची नियमावली आडवी आली. मग जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल उपचाराविना तडफडत मरण पावलेल्या ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील हळदा, पद्मापूर, (भूज), बल्लारपूर व परिसरातील गाव परिसरात वाघाने धूमाकूळ घातला होता. त्या वाघाने पाच जणांचा बळी घेतला होता. यामुळे संबंधित गावकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन करून वनविभागाला जेरीस आणले होते. गावकऱ्यांनी कायदा हातात घेतला म्हणून ४९ आंदोलनकर्त्या गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक केली होती.या घटनेमुळे विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पीडित गावकºयांनी २३ जून २०१७ रोजी चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या कार्यालय परिसरात ठिय्या मांडला. नंतर शेळके यांना त्यांच्या कक्षात घेराव घातला होता. वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका आ. वडेट्टीवार यांनी त्यावेळी घेतली होती. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना वाघाला ठार मारण्याचे आदेश द्यावे लागले होते. हे आदेश प्राप्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या कक्षात बसूनच पाठपुरावा केला होता हे विशेष.एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे आदेश मिळविण्यासाठीही समिती गठण करणे बंधनकारक होते. या समितीच्या अहवालानुसारच वाघाला ठार करण्याचे आदेश देता येतात. मग काही तासातच समिती गठित झाली. समितीने तसा अहवाल दिला आणि वाघाला ठार करण्याचे आदेश मिळविले, असे असेल, तर ही किमया वनविभागाने वाघावर उपचार करण्यासाठी साधायला हवी होती. ही बाब ताडोबाच्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी असती. ‘येडा अण्णाची’ प्रकृती नाजूक होती. वनविभागाने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हा सकारात्मक संदेश यातून गेला असता, हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाघाला मारण्यासाठी नव्हे, तर वाचविण्यासाठी नियमावली?वाघाने एखाद्या परिसरात धुमाकूळ घातला तर त्याला लगेच ठार करण्याचे आदेश दिले जात नाही. वाघाने गावात व गाव परिसरात सात जणांचा बळी घेतल्यानंतरच एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी जाणकार वन्यजीवप्रेमींची माहिती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात ‘त्या’ वाघाने धूमाकूळ घातला होता हे खरे असले तरी वाघाचे हल्ले हे जंगल परिसरातील होते. असे असतानाही चंद्रपूर मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला ठार करण्याचे आदेश एका दिवसातच नव्हे, तर काही तासांतच मिळविले होते. असाच आदेश वाघाच्या उपचारासाठीही मिळविला असता, तर वनविभागावर टीकेची झोड उठली नसती.

टॅग्स :Tigerवाघ