शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : मुस्लिम समाजातील २१ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विवाह सोहळ्यासारख्या पवित्र बंधनालाही महागाईचा फटका बसला आहे. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुहेरी पेचात अडकलेल्याना विवाह सोहळ्याचा खर्च आर्थिक संकटात टाकणारा आहे. यावर उपाय म्हणून गरिब, गरजूंनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज असून असे आयोजन आता काळाजी गरज बनली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.यावेळी पुुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले, काळाची गरज ओळखून तुकडोजी महाराजांनी सामूहिक विवाह सोहळयाची संकल्पना ग्रामगीतेतून मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला एकरुप होऊन असे आयोजन करण्याची गरज आहे. खरे तर, अनेक सेवाभावी संस्थांकडून सामूहिक विवाह सोहळयांचे आयोजन केल्या जात आहे. मात्र यात विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी असते. त्यामुळे समाजानेही आता कोणताही संकोच मनात न बाळगत अशा आयोजनात सहभाग घेतला पाहिजे, असेही जोरगेवार म्हणाले.मुस्लीम महिलांचेही सामाजिक कार्यात योगदान- शाहीन शेखमुस्लिम समाजाच्या महिला आता सामाजिक क्षेत्रात समोर येत आहे. महिलांनी समाजाच्या महिलांचा संसार थाठण्यासाठी केलेले सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन हे ऐतिहासिक असून पुढे संस्थेच्या वतीने असे आयोजन केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख यांनी केले. या संस्थेत महिला कार्यरत असून हे या संस्थेचे दुसरे आयोजन आहे. मागच्या वर्षी झालेल्या सामूहि क विवाह सोहळयात समाजाच्या ११ जोडप्यांचा विवाह संस्थेच्या वतीने विवाह करण्यात आला होता. यंदा २१ नवे जोडपी विवाह बंधनात बांधल्या गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Socialसामाजिक