शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडची एमआयडीसी नागभीडलाच भार !

By admin | Updated: December 17, 2015 01:09 IST

नागभीड येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २५ वर्षाचा कालावधी होत असला तरी या एमआयडीसीने नागभीड तालुक्याला काय दिले, ...

एक पिढी बरबाद : भूखंड २५ वर्षांपासून धूळ खातघनश्याम नवघडे नागभीडनागभीड येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २५ वर्षाचा कालावधी होत असला तरी या एमआयडीसीने नागभीड तालुक्याला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यातच एक संपूर्ण पिढी गेली.पूर्णपणे धान शेतीवर अवलंबून असलेला हा तालुका आहे. पण गेल्या १०-१५ वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे या धानशेतीचे पार बारा वाजले आहेत. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या गेला आहे. सतत येणारी नापिकी आणि वाढत चाललेले कर्जाचे डोंगर, यामुळे आत्महत्येसारखा मार्गही या तालुक्यातील शेतकरी पत्करायला लागला आहे. शेतकऱ्यांवर ही वेळ येवू नये यासाठी येथे शेतीला पुरक किंवा विविध उद्योगांची निर्मिती करण्यात आली असती तर या तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्य संधी निर्माण झाल्या असत्या. पण या दिशेने कोणतेच पाऊल उचलल्या न गेल्याने नागभीडची एमआयडीसी नागभीडच्या जीवावर भार झाली आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.नागभीडला एम.आय.डी.सी. मंजूर झाल्यानंतर नागभीड-नागपूर राज्य महामार्गावर नवखळानजिक या एम.आय.डी.सी.साठी जमीन अधिग्रहीत करण्यात आली. उद्योगासाठी शेकडो प्लॉट पाडण्यात आले. या प्लॉटच्या वितरणाची प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात आली. अतिशय अल्पावधीत हे प्लॉट वितरित करण्यात आले. पण प्लॉट वितरित झाल्यानंतर या प्लॉटधारकांनी काय ‘दिवे’ लावले याची शहानिशा करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली असती तर नागभीडच्या एम.आय.डी.सी. वर आज जी अवकळा आली आहे, ती अवकळा कदाचित आली नसती.उद्योगाच्या नावावर स्वस्तात प्लॉट मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी येथे प्लॉट बुक करून घेतले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या प्लॉटधारकांचा ‘उद्योग’ प्लॉट बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही या एम.आय.डी.सी.चा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एम.आय.डी.सी.त काहीच दिसत नाही. नाही म्हणायला या एम.आय.डी.सी.मध्ये दोन-चार उद्योग सुरू आहेत. पण त्यांच्यातही कोणाच्या हाताला उद्योग देण्याची क्षमता नाही.शासनाला या एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर गेल्या २५ वर्षात ज्यांनी ज्यांनी येथील प्लॉट बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे प्लॉट परत घेण्याची प्रक्रीया सुरू करावी. प्लॉट परत घेतल्यानंतर नवीन लोकांना प्लाट वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा, निश्चितच अवघ्या काही वर्षात यात बदल जाणवेल.