शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आईच्या पार्थिवाला मुलींनीच दिला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:00 AM

मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही.

ठळक मुद्देरुढी परंपरेला फाटा देत पार पाडले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे (८०) यांचा शनिवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणही खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि तिच्या भावाने रुढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. सोबतच आईच्या पार्थिवाला भडाग्नीदेखील मुलीनेच दिला.मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही. ते अपवित्र समजले जाते. परंतु सुमित्राबाई यांचा मुलगा संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास सहमती दर्शवून महिलांनाही अंत्यसंस्कारात स्थान दिले. यावेळी संभाजी साळवे व मारोती साळवे या दोन मुलासह, मुलगी व सुनेनेसुद्धा सुमित्राबाईच्या पार्थिवाला खांदा देऊन चितेला भडाग्नी दिला. त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला. जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे, तेवढाच मुलीचासुद्धा आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.साळवे परिवाराने २०१९ मध्ये आपल्या वडिलांचा अंतिमसंस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा, असे संभाजी साळवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यू