शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 2:59 PM

मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो.

ठळक मुद्देजिवती तालुक्यातील अनेक गावांत नेटवर्क नाही

दीपक साबने

चंद्रपूर : एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत; परंतु नेटवर्कअभावी लांबोरी व परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. लांबोरी, येल्लापूर, नारपठार, बुरियेसापूर, शेडवाही (लांबोरी) इत्यादी व परिसरातील गावांतील हजारो मोबाइलधारकांना तेलंगणाच्या नेटवर्कवर विसंबून राहावे लागत आहे.

तालुक्यात लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या तीन गावांमध्ये जिओचे टॉवर उभे केले आहेत. मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे मात्र, अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. ते फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. लांबोरी व परिसरातील गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो. तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.

मागील चार वर्षांअगोदर जिओच्या टॉवरचे काम सुरू झाले, ते पाहून नागरिक आनंदी होते. गावकऱ्यांनी जिओचे सीम घेऊन ठेवले. आज ना उद्या हे जिओचे टॉवर सुरू होतील आणि आपली नेटवर्कची समस्या सुटेल या आशेत गावकरी होते. मात्र, या आशेवर मागील चार वर्षांपासून विरजण पडल्याचे चित्र लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या गावांतील व परिसरातील नागरिकांत दिसून येत आहे.

ग्रामपंचायत लांबोरी येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता जिओचे टॉवर दिसले. तो सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्रदेखील ग्रामपंचायतीने दिले आहे. यासंदर्भात अनेक निवेदनेही देण्यात आली; परंतु अद्याप जिओचे टॉवर सुरू झाले नाहीत. टॉवर असून नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलधारकांना तेलंगणा राज्याच्या नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे.

लांबोरी या गावच्या परिसरातील नागरिक नेटवर्कच्या शोधात असतात. नेटवर्क भेटलेच तरी संपर्क होणे कठीण होते. इंटरनेट सेवा तर कुचकामीच ठरत आहे. अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना व गावातील परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. जिओचे टॉवर सुरू झाल्यावर मोबाइलधारकासह, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कामकाज करताना याचा लाभ होणार आहे. नेटवर्क नसल्यामुळे महागडे रिचार्ज निकामी ठरत आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInternetइंटरनेटSocialसामाजिक