शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अमलनाला धरणातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:56 IST

‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.

ठळक मुद्देकालव्यांची डागडुजी नाही : सिंचनाचे पाणी नाल्यात

आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : ‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुड्डम असे दोन सिंचनाचे प्रकल्प असून शेकडो हेक्टर शेतीचे सिंचन या दोन्ही धरणावर अवलंबून आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे पूर्णत: दुर्लक्ष असून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, याकरिता पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. उन्हाळ्यामध्ये नियोजन करून फुटलेले कालवे व्यवस्थित करणे, अनावश्यक पाणी वाहून जात असलेल्या ठिकाणी सुधारणा करणे, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची समस्या समजून घेणे यापैकी कोणतीही गोष्ट करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आढळत नाही. शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांचा संवाद संपल्यामुळे अशाप्रकारे पाटाच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. कोरपना तालुका हा कापूस, सोयाबीन, गहू, तुरी, मिरची अशा विविध पिकांसाठी प्रसिद्ध असला तरी अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सिंचनाची व्यवस्था नाही. निसर्गाच्या कृपेने अमलनाला व पकडीगुड्डम या धरणामुळे सिंचनाची व्यवस्था होईल, या आशेने असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते.शेतापर्यंत पाटाचे पाणी पोहोचत नाही. मध्येच कालवे लिकेज होतात. काही शेतकऱ्यांनी बांध टाकून पाट फोडून टाकले. मात्र अशा शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाकडून कधीही कारवाई झाल्याचे ऐकण्यात नाही.गडचांदूरकडून बिबी मार्गे नांदा जाणाऱ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाटाचे पाणी वाहत आहे. बिबी येथे असणारा बंधारा पूर्ण भरला असून पावसाळ्याचे पाणी असल्यासारखी स्थिती नाल्यामध्ये पाटाच्या पाण्यामुळे दिसून येत आहे. हेच पाणी शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करून देण्याकरिता उपयोगी आले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गडचांदूर पाटबंधारे विभागाचा पाट आमच्या शेतापर्यंत पोहोचला आहे. मात्र पाटाचे पाणी पोहोचले नाही. सर्व पाणी बाहेर वाहून चालल. मात्र आमच्या शेताला पाणी नाही. त्यामुळे शेत कोरडे पडून पिकांचे नुकसान होत आहे.- पंडित ढवस शेतकरी, बिबी