शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

अमलनाला धरणातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:56 IST

‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.

ठळक मुद्देकालव्यांची डागडुजी नाही : सिंचनाचे पाणी नाल्यात

आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : ‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुड्डम असे दोन सिंचनाचे प्रकल्प असून शेकडो हेक्टर शेतीचे सिंचन या दोन्ही धरणावर अवलंबून आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे पूर्णत: दुर्लक्ष असून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, याकरिता पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. उन्हाळ्यामध्ये नियोजन करून फुटलेले कालवे व्यवस्थित करणे, अनावश्यक पाणी वाहून जात असलेल्या ठिकाणी सुधारणा करणे, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची समस्या समजून घेणे यापैकी कोणतीही गोष्ट करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आढळत नाही. शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांचा संवाद संपल्यामुळे अशाप्रकारे पाटाच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. कोरपना तालुका हा कापूस, सोयाबीन, गहू, तुरी, मिरची अशा विविध पिकांसाठी प्रसिद्ध असला तरी अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सिंचनाची व्यवस्था नाही. निसर्गाच्या कृपेने अमलनाला व पकडीगुड्डम या धरणामुळे सिंचनाची व्यवस्था होईल, या आशेने असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते.शेतापर्यंत पाटाचे पाणी पोहोचत नाही. मध्येच कालवे लिकेज होतात. काही शेतकऱ्यांनी बांध टाकून पाट फोडून टाकले. मात्र अशा शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाकडून कधीही कारवाई झाल्याचे ऐकण्यात नाही.गडचांदूरकडून बिबी मार्गे नांदा जाणाऱ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाटाचे पाणी वाहत आहे. बिबी येथे असणारा बंधारा पूर्ण भरला असून पावसाळ्याचे पाणी असल्यासारखी स्थिती नाल्यामध्ये पाटाच्या पाण्यामुळे दिसून येत आहे. हेच पाणी शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करून देण्याकरिता उपयोगी आले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गडचांदूर पाटबंधारे विभागाचा पाट आमच्या शेतापर्यंत पोहोचला आहे. मात्र पाटाचे पाणी पोहोचले नाही. सर्व पाणी बाहेर वाहून चालल. मात्र आमच्या शेताला पाणी नाही. त्यामुळे शेत कोरडे पडून पिकांचे नुकसान होत आहे.- पंडित ढवस शेतकरी, बिबी