शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय कार्यालयाचे स्थलांतरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

जुने उमरहिरा सोयीसुविधांपासून दूर कोरपना : तालुक्यात जुने उमरहिरा हे गाव आहे. या गावातील मध्यंतरीच्या काळात लोकांनी स्थलांतर केल्याने ...

जुने उमरहिरा सोयीसुविधांपासून दूर

कोरपना : तालुक्यात जुने उमरहिरा हे गाव आहे. या गावातील मध्यंतरीच्या काळात लोकांनी स्थलांतर केल्याने सदर गाव ओस पडले आहे. सद्यस्थितीत या गावात रस्ते , पाणी, वीज, आरोग्य शिक्षण आदी सुविधांची वानवा आहे.

कर्ज मिळविण्यात बेरोजगारांची अडचण

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी केला आहे.

अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

भद्रावती : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा

चंद्रपूर : अमननाला हा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प माणिकगड पहाडात असल्याने प्रेक्षणीय आहे. त्यामुळे दररोज या ठिकाणाला दूरवरून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. मात्र येथील वेस्ट वेअरकडे जाण्याचा रस्ता अत्यंत खडतर असल्याने पर्यटकांची गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी

वरोरा : नगर परिषदच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील नाल्यांची योग्य स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून विविध वाॅर्डांत कचरा साचलेला दिसून येतो. स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र, त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे.