शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची लागवड आता नव्या तंत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा मंगल जीवने बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि ...

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा

मंगल जीवने

बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मजुरीचे नियोजन या बाबींना अनुसरून शेतीचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. यंदा मात्र बल्लारपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. नव्या तंत्राने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची लागवड करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

बल्लारपूर तालुक्यातील २८ किलोमीटरवर असलेले मोहाडी तुकूम हे ३९२ लोकवस्तीचे गाव. या आदिवासीबहुल गावातील शेतकरी सचिन कपूर हा सुमारे २० वर्षांपासून आपल्या शेतात धानाचे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होता. त्यामधून त्याला जेमतेम उत्पादन मिळत होते. फायदा होत नव्हता. त्याला शेतीत बदल करून काही नवीन करायचे होते. अशात सचिन कृषी विभागाच्या संपर्कात आला. त्यांनी आपली व्यथा कृषी सहायक निलेश इंगळे यांना सांगितली व त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सचिनने सदर योजनेसाठी प्रस्ताव दिला व आंबा पीक लागवड करण्याची मंजुरी मिळताच त्यांनी स्वतःच्या खर्चाने मनसर जिल्हा नागपूर येथून दशहरी व केशर या वाणाच्या कलमांची खरेदी केली व उन्हाळ्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ०.५० हेक्टरवर २०० आंब्याच्या झाडाची लागवड केली. उन्हाळ्यात झाडांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सभोवती हिरव्या नेटचा उपयोग केल्यामुळे सघन पद्धतीने लावलेली झाडे सुरक्षित असून वाढीला लागले आहेत. या फळबागेची उपविभागीय कृषी अधिकारी यांनी पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले व सचिनचा उत्साह वाढविला. यावेळी कृषी सहायक श्रीकांत ठवरे यांनी सांगितले की आंबा उत्पादनाला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

बॉक्स

नव्या तंत्राचे वैशिष्ट्य

-सघन पद्धतीने १२ बाय ४ फुटच्या खड्ड्यात अंतरावर लागवड केल्या जाते. -

-झाडाची उंची १० फुटापर्यंत वाढते.

-कमी उंची असल्याने वादळ वाऱ्याने झाडाचे नुकसान होत नाही.

-एका झाडापासून सरासरी १० ते १५ किलो उत्पादन होते.

कोट

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरु करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यासाठी सचिन कपूरने घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.

-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.

150721\ambaa.jpg

आंब्याच्या लागवडीची माहिती देताना अधिकारी