शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 01:08 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर

३८ लाखांच्या वीजचोऱ्या : ५३ जणांविरुध्द केला गुन्हा दाखल चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीजचोरांना महावितरणने यंदा जोरदार शॉक दिला. या वीज चोरांनी तब्बल ३७ लाख ९४ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ४१६ ग्राहकांकडून वीजचोरीपोटी असलेली ३० लाख २७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वीजचोरी करणाऱ्या ५३ जणांविरूध्द गुन्हाही नंोदविण्यात आला. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १६ लाख ०६ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या एकटया चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या व एकूूण १५२ वीजचोरांवर कडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळाने २१ लाख ८२ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या व एकूण ३७५ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले. यापैकी सर्वाधिक २०१ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून, १०८ प्रकरणे गडचिरोली विभाग, ६६ आलापल्ली, २६ वरोरा विभागातील, ६६ बल्लारपूर विभाग तर ६० चंद्रपूर विभागातील आहेत. या सर्व वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. आढळलेल्या वीजचोऱ्यात २५१ वीजचोरांनी आकडे टाकून तर २७६ वीजचोरांनी सरळ मीटरसोबत छेडछाड करीत वीजचोरी केल्याचे महावितरणच्या गस्ती पथकास आढळून आले. वीजचोरी करण्यासाठी वीजचोरांनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीजवापर करणे, मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे अशा विविध क्लुप्त्या वापरून वीजचोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी) पावसाचा बसला होता फटका अवकाळी पाऊस तसेच वादळवाऱ्यामुळे सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात ़एकूण ७१४ उच्चदाबाचे तर १९५२ लघुदाबाचे खांब तर १४६ रोहित्राचे नुकसान झाले आहे. यापैकी ६७२ उच्चदाबाचे तर १८७८ लघुदाबाचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले. तसेच १४४ रोहित्र दुरूस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सरत्या वर्षात महावितरण कंपनीकडून तब्बल चार हजार ७८ कृषीपंपाच्या वीज जोडण्या करून देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.