शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : ऊर्जानगर, दुर्गापुरातही कडक अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असतानाही जिल्ह्यात गुरूवारपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या २२८ झाली. त्यातील ६२ रूग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र तसेच ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारपासून रविवारी २६ जुलैपर्यंत १० दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. परिणामी, गजबजणारे रस्ते पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत. बाजारपेठा सुन्यासुन्या झाल्या. शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन दोन टप्प्यात विभागण्यात आला आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला. जिल्ह्यात १० दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अचानक २०० पर्यंत पोहोचली. आता तर दिवसागणिक १० ते १२ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे १० दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले.सर्व दुकाने कडकडीत बंदजिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १७ ते २१ जुलै या पहिल्या पाच दिवसात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ ते २६ जुलै कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, थोक विके्रते, जसे खाद्य पदार्थ, किराणा, दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषीविषयक दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांसह सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले.शेतमालावर पुन्हा कुऱ्हाडशहरातील सर्व हॉटेल्स घरपोच सुविधा आज बंद होती. २१ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने दररोजविक्री करावीच लागते. मात्र, आजपासून पाच दिवस भाजीपाला विक्री बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहेनागरिकांनी घरीच राहणे केले पसंतगेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असताना आजपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरूवारी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबळ उडाली होती. नागरिकांनी आज घरीच राहणे पसंत केले.मनपाकडून अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहीमकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन सुरू होताच महानगर पालिकेकडून आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली. या कालावधीत काळातील दहा दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. कोरोना संसर्गाची तात्काळ माहिती देणाºया अ‍ॅन्टिजेन तपासणीचा यावेळी सर्वाधिक वापर केल्या जाणार आहे.फक्त मेडिकल स्टोअर्स सुरूजिल्हा प्रशासनाने सर्व मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज चंद्रपूर शहर व दुर्गापुरातील सर्व मेडिकल स्टोअर्स सुरू होते.ऊर्जानगर, दुर्गापुरात शुकशुकाटकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने ऊर्जानगर व दुर्गापुरात शुकशुकाट पसरला होता. जीवनाश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. ऊर्जानगर व दुर्गापूर चौकात दररोज अनुभवाला येणारी कामगारांची गर्दी व वाहतूककोंडी आढळून आली नाही.शासकीय कार्यालये, खासगी हॉस्पिटल सुरूआज सकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत काही विक्रेते घरपोच दूध वितरण केल्याचे दिसून आले. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, न्यायालय, राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरू होती.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या