शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाकडे जिल्हा परिषद सदस्यांची पाठ

By admin | Updated: March 16, 2015 00:40 IST

मिनी मंत्रालयात असलेल्या सदस्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास अपेक्षित आहे. त्यांना विविध योजनांची माहिती मिळावी ...

साईनाथ कुचनकार चंद्रपूरमिनी मंत्रालयात असलेल्या सदस्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास अपेक्षित आहे. त्यांना विविध योजनांची माहिती मिळावी व त्यातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी शासनाने राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत अमरावती येथे तीन दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र या प्रशिक्षणाला जाण्याचे सदस्यांनी टाळले. केवळ बोटावर मोजण्याइतक्याच सदस्यांनी प्रशिक्षणाला उपस्थिती लावून जिल्ह्याची लाज राखली.जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविल्या जातो. येथील समस्या सोडविण्यासाठी या सदस्यांची कामगिरी महत्त्वाची असते. विकासासाठी नागरिकांची सदस्यांकडे अपेक्षा असते. याच उद्देशाने त्यांना जिल्हा परिषदमध्ये पाठविले जाते. मात्र निवडून आल्यानंतर बहुतांश सदस्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर मात्र नागरिक आणि सदस्यांमधील अंतर वाढत जाते. प्रत्येक सदस्य सक्षम व्हावा, त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, एवढेच नाही तर सभागृह चालविताना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची, अधिकाऱ्यांकडून कामे कशी करवून घ्यायची याबाबतचे प्रशिक्षण सदस्यांना देण्यासाठी शासनाने राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांनतर्गत अमरावती येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला प्रत्येक सदस्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांनी घरीच राहणे पसंत केले. केवळ १८ ते २० सदस्यांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली. शासनाने ज्या उद्देशाने प्रशिक्षण आयोजित केले होेते त्या उद्देशाकडेच सदस्यांनी पाठ फिरविली आहे.या विषयांवर होते प्रशिक्षणपंचायत राज संरचना, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील महत्त्वाच्या तरतुदी, मानव विकास निर्देशांक, केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना, महिला विषयक कायदे, महिला व बाल विकास योजना, जिल्हा परिषदेच्या विविध सभा, कामकाज व नियम, पदाधिकारी व अधिकारी परस्पर संबंध, विकास योजनांचे सर्वेक्षण, आराखडा, प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा नियोजन समितीची रचना आणि कार्यपद्धती, जिल्हा परिषदेचे वित्तीय व्यवस्थापन, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामीण बांधकामाचा दर्जा, नियंत्रण आणि निकश, स्वच्छ भारत अभियान, आदर्श गावांची संकल्पना, गाव सुक्ष्म नियोजन प्रक्रिया, संवादातून प्रभावी नेतृत्व आदी.पंचायत समिती सदस्यही मागे नाहीराजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य तथा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी शासनाने सिंदेवाही येथील ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणालाही बोटावर मोजण्याइतक्या सदस्यांनी हजेरी लावली. काहींना केवळ औपचारिकता म्हणून आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी हजेरी लावली.प्रशिक्षण कशासाठी ?निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांना जिल्हा परिषदेबाबत पाहिजे तशी माहिती असतेच असे नाही. त्यामुळे अनेकवेळा त्यांना विकासाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले. कधीकाळी अधिकारीही त्यांच्याकडे कानाडोळा करतात. माहितीच्या अभावामुळे असे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. मात्र या प्रशिक्षणाकडे फिरकण्याचे औचित्यही सदस्य दाखवित नाही.लाखो रुपयांचा खर्चशासन सदस्यांच्या खर्चासाठी लाखो रुपयांची तरतूद करते, मात्र सदस्यांची प्रशिक्षण घेण्याची मानसिकताच नसल्याने करण्यात येणारा खर्च व्यर्थ जात आहे. प्रशिक्षणाला जायचे नसल्यास तसे कळवून किमान शासनाचा खर्च तरी सदस्यांनी वाचविणे अपेक्षित आहे.