शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाईपलाईनमधून गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:19 IST

शहरातील बाबूपेठ वॉर्डातील श्री बालाजी मंदिराजवळील पाईपलाईनमधून पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्र्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : बाबूपेठ परिसरातून हजारो लिटर पाणी वाया

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बाबूपेठ वॉर्डातील श्री बालाजी मंदिराजवळील पाईपलाईनमधून पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्र्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. चंद्रपूर महानगराचीही परिस्थिती काही वेगळी नाही. यासंदर्भात अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र, याकडे मनपा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही. मनपाच्या अखत्यारितील खासगी कंपनीच्या कंत्राटदारामार्फत शहराला पाणी पुरवठा होतो. या कंपनीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची भीषण समस्या यापूवीर्ही उद्भवल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलिकडेच पाणी टंचाईचे कारण पुढे करून एक दिवसाआड बाबूपेठ परिसरात पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असूनही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मनपा प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण करणारी आहे. पाईप लाईनची गळती अजूनही सुरूच असल्याची माहिती नागरिकांनी दिली.