शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम तोंडावर असताना मान-अपमानात अडकला खरीप आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व ...

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व हंगामापासून तर उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागल्या. निसर्गाने साथ दिल्याने बऱ्यापैकी उत्पादन झाले ही जमेची बाजू होय. परंतु, विक्री व्यवस्थेची साखळी तुटल्याने गतवर्षी हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यातच सुलतानी कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या तुलनेत फारसे उत्पादन वाट्याला आले नाही. कृषी कर्जाअभावी काही शेतकऱ्यांची कोंडी झाली. पण, कडक लॉकडाऊनमुळे अन्य क्षेत्रांची पिछाडी होत असताना शेतीचे रहाटगाडगे मात्र सुरळीत होते. यंदा पुन्हा ऐन हंगामातच कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या कृषिक्षेत्राच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला दीर्घकालीन हिताची सांगड घालण्यातच खरे हित आहे.

विलंब झाल्यास शेतीचेच नुकसान

पीक घेण्यासाठी स्वत:ला मातीत गाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांना मान-अपमान नाटकात कोण दोषी आणि कोण खरे, याबाबत देणे-घेणे नाही. खरीप हंगाम नियोजन आराखड्याच्या मंजुरी देताना विलंब झाल्यास पुढील प्रत्येक टप्प्यावर थेट शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, याचीच अनेकांनी भीती आहे. गतवर्षी तर कडक लॉकडाऊन असतानाही तत्परता दाखविण्यात आली होती, हे विशेष.

बैठकीत विधायक सूचनांचा सुकाळ!

गतवर्षी कडक लॉकडाऊन असतानाही आराखड्यावर शिक्कामोर्तब झाले आणि खरीप हंगाम पूर्ण होऊ शकला. एकतर नियोजन बैठकीत विधायक सूचना करणाऱ्यांचा सुकाळ असतो, हे आजवरच्या अनेक बैठकांतून पुढे आले आहे. त्यामुळे मानसन्मानात आराखडा अडकविण्यापेक्षा शेतकरी हिताकडे लक्ष देणे यातच खरी राजकीय परिपक्वता आहे.

चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर खरीप नियोजन

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा खरीप हंगामात चार लाख ८२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन आहे. गतवर्षी चार लाख ६३ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा भात व कपाशीचे लागवड क्षेत्र वाढविण्यात आले आहे. भाजीपाला व पिकांचे क्षेत्र नऊ हजारावरून बारा हजार हेक्टर नियोजित करण्यात आले.

पीकनिहाय क्षेत्र- हेक्टर

भात- एक लाख ८५ हजार

सोयाबीन- ५७ हजार २००

कापूस- एक लाख ८८ हजार

तूर- ४० हजार

इतर- १२ हजार