शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक एम्टा कंपनीवर साडेसहा कोटी रूपये थकीत

By admin | Updated: February 24, 2015 01:50 IST

पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या कंपन्यांना बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २४

चंद्रपूर : पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या कंपन्यांना बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर २०१४ ला दिले. या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टा ही कोळसा खाण कंपनी ३१ मार्च २०१५ ला आपली आस्थापना बंद करणार आहे. मात्र, या कंपनीवर आस्थापना खर्च, जाहिरात खर्च व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे असे एकूण ६ कोटी ४७ लाख रूपये थकीत आहेत. थकीत रक्कम जिल्हा प्रशासनाकडे भरावी, असे कंपनीला वारंवार कळविल्यानंतरही कंपनीने थकीत रक्कम अद्यापही भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक एम्टा या कंपनीने अंदाजे २००५-०६ या वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उत्खननाला सुरूवात केली. या कंपनीचे कार्यक्षेत्र सर्व्हे नं. १८७६ मध्ये १००७.०५ हेक्टरवर असून यामुळे १८७६ शेतकरी प्रकल्पग्रस्त झालेत. प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्याच्या स्वरूपात कंपनीकडून मदत देण्यात आली आहे. मात्र, केवळ १२०४ शेतकऱ्यांनाच आजपर्यंत मोबदला मिळाला. उर्वरीत ६७२ शेतकरी अद्यापही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक एम्टा कंपनीवर आस्थापना खर्च १ कोटी ५३ लाख १४ हजार ६२१ रूपये तसेच सर्व प्रकरणांचा जाहिरात खर्च अंदाजे १ लाख रूपये व निवाड्यापोटी कमी भरलेली ४ कोटी ५१ लाख ९३ हजार ७४१ असे ६ कोटी ४७ लाख रूपये थकीत आहेत. ही रक्कम कंपनीने १५ जानेवारी २०१५ पर्यंत भरावी, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. परंतु, कंपनीने ही रक्कम अद्यापही भरली नसल्याचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या पत्रात नमूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कर्नाटक एम्टा कंपनीला दिलेला खाण परवाना रद्द करण्यात आला असून न्यायालयाच्या निर्णयानुसार ३१ मार्च २०१५ ला कंपनीने आपली आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कं पनी बंद होणार असल्याने कंपनीची ुजिल्ह्यातील स्थावर व जंगम मालमत्ता हलविण्यात येणार आहे. त्यामुळे कंपनीकडून येणे असलेली शासकीय रक्कम असल्याने संबधीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला वाटपाकरिता ही रक्कम थकीत जमीन महसुलाप्रमाणे वसूल करणे आवश्यक असल्याचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शासनाचा महसूल बुडू नये, याकरीता कंपनीकडून रकमेची वसूली करण्यात यावी, याकरीता संबधीत रकमेची वसुली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १७९ ते कलम १९५ मधील तरतुदीनुसार महसूल वसुली प्रमाणपत्र (आर. आर. सी.) तयार करून प्रस्तावास मंजुरीकरीता सादर करावा, असे भूसंपादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)‘आरआरसी’ नुसार रक्कम वसूल करा४कर्नाटक एम्टा कंपनीवर साडेसहा कोटी रूपये थकीत आहेत. कंपनीने ही रक्कम अद्यापही भरलेली नसल्याने शासनाचा महसूल बुडू शकतो. तर अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहू शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मार्चला कंपनीची आस्थापना बंद होणार आहे. त्यामुळे थकीत रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १७९ ते कलम १९५ मधील तरतुदीनुसार महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नुसार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे पत्रात म्हटले आहे. जमीन महसूल संहिता आरआरसी नियमात कंपनीची मालमत्ता विकून रक्कम वसूल करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आहेत. आरआरसी प्रस्तावाला जिल्हाधिकारी मंजूरी देत असतात.या गावातील शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत४कर्नाटक एम्टा कंपनीचा खाण परवाना भद्रावती तालुक्यात असून या कंपनीमुळे तालुक्यातील बंजारा मोकासा, कढोली, सोमनाला, केसुर्ली, बंजारा चक, बंजारा मोकासा गावठाण, चक बंजारा गावठाण या गावातील शेतकरी प्रकल्पग्रस्त झालेत. यातील अनेकांची घरे गेली तर काहींची शेती. ज्यांची घरे गेली त्यांना कंपनीने घरच बांधून द्यावी, अशी मागणी आहे.