शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे परिवहन महामंडळाला ग्रहण : जून महिन्यात ८.५० कोटींचा घाटा

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. आजघडीला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे.परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात जवळपास २५० बस नियमितपणे धावतात. चंद्रपूर विभागात येणाºया चार आगारांच्या माध्यमातून लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे काम लालपरी करते. २५० बसेसच्या जवळपास एक हजार फेºया दररोज एसटीच्या होतात. यातून पूर्वी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत होते.मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून आजपर्यंत हे लॉकडाऊन व कोरोना संसर्ग अविरत सुरूच आहे. लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच तब्बल तीन महिने एसटी जागेवरच थांबली.परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे. जून महिन्यात एरवी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत असताना यावेळी मात्र महिन्याकाठी केवळ ४५ लाखापर्यंतच उत्पन्न मिळू शकले. त्यामुळे जिल्ह्यात महामंडळाला जून महिन्यात ८.५० कोटींचे नुकसान सहन करावे लागले.२५० पैकी ६० बसेस रस्त्यावरचंद्रपूर जिल्ह्यात महामंडळाच्या जवळपास २५० बस असून त्यापैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. एरवी चंद्रपूर जिल्ह्यातील बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व सेवा विस्कळीत झाली आहे. केवळ जिल्ह्यांतर्गतच बसफेऱ्या सुरू आहेत. या ६० बसेसच्या माध्यमातून दररोज केवळ ३०८ फेऱ्या होत आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातराज्यात लॉकडाऊनपासून बंद असलेली लालपरी २२ मेपासून जिल्ह्य अंतर्गत सुरू झाली. यामधे शासनाने अनेक निर्बंध घालून बस सुरू केली. त्यात ५० टक्के प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. मर्यादित बसफेऱ्या असल्याने दररोज ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच पाचारण करण्यात येत आहे. एसटी तोट्यात चालत असल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे ५० टक्के पगार देण्यात आले तर जून महिन्याचे तर वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात २५० बसेसपैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून बससेवा दिली जात आहे. ५० टक्केच प्रवाशी बसविले जात असल्याने महिन्याकाठी महामंडळाला साडेआठ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,एसटी महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी