शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

औद्योगिक तालुक्यातच रोजगाराचा प्रश्न ज्वलंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

आवाळपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योग कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आला असून, प्रगतसुद्धा झाला आहे. मात्र ...

आवाळपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योग कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आला असून, प्रगतसुद्धा झाला आहे. मात्र येथील बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून, बेरोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योगाने या तालुक्यात आपले दुकान थाटले. गावकऱ्यांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या उद्देशाने शेती अल्पदरात देण्यात आल्या. त्याबदल्यात काही लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्यावेळेस गावकऱ्यांनी कोणताही दुष्परिणाम न लक्षात घेता स्वागतच केले. कारखाने सुरू झाले. उत्पादनही कोट्यवधीचे होऊ लागले. मात्र त्याप्रमाणे येथील गावांचा आणि स्थानिक नागरिकांना कुशल कामगार म्हणून नेमण्यास आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली.

काही स्थानिक कामगारांनी १५ वर्ष संघर्ष करून आपला लढा पूर्णत्वास नेला. आजही काही कारखान्यात अशा प्रकारची विदारक स्थिती दिसून येते की जमीन अल्पदरात घेऊन नोकरी कबुल केली. मात्र अजूनही कुशल कामगार म्हणून घेण्यात आले नाही. स्थानिक कामगारांना डावलण्यात येते. त्यांच्यावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो आणि परप्रांतीयांचा भरणा केला जातो. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांंची फळी पडलेली असून, त्यांचा हाताला काम नाही.

अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शहरांमध्ये तुटपुंजा मानधनावर काम करत आहे. तांत्रिक युवक आपल्याला स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळेल, या आशेवर जगत आहेत. परंतु कारखान्यात असलेल्या रिक्त जागांवर व विविध पदांवर परप्रांतीय लोकांना वाव देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तेव्हा या तालुक्यातील स्थानिक बेरोजगार युवकांचा फायदा तरी काय, असा प्रश्न बेरोजगार युवक करीत आहे.

बॉक्स

अजूनही रोटेशन पद्धतीवरच काम

आजही काही कारखान्यात रोटेशन तत्त्वावर कामगार काम करत आहेत. त्यांना कधी कामावर घेतले जाते, तर कधी १५ दिवसातून एकदा कामावर घेतले जाते. त्यामुळे अशा लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. कामगारांच्या हाताला काम नसल्याने ते भाजीपाला, घर बांधकाम आणि ट्रॅक्टरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवीत आहेत.

बॉक्स

कामगार संघ नावापुरतेच

आपला हेतू साध्य करण्याकरिता आणि हित जोपासण्याकरिता कारखान्यामध्ये कामगार संघ स्थापन केले आहे. परंतु ते फक्त नाममात्र झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय लोकांचा भरणा वाढतच चालला आहे. या सर्व समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कायमचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. एकीकडे शासन ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य या तत्त्वावर कारखान्यांना परवानगी देत असले तरी त्या भागातील युवकांचा भ्रमनिरास होत असून, बेरोजगारीचा प्रश्न जटिल होत आहे.