शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

औद्योगिक तालुक्यातच रोजगाराचा प्रश्न ज्वलंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

आवाळपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योग कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आला असून, प्रगतसुद्धा झाला आहे. मात्र ...

आवाळपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योग कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आला असून, प्रगतसुद्धा झाला आहे. मात्र येथील बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून, बेरोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योगाने या तालुक्यात आपले दुकान थाटले. गावकऱ्यांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या उद्देशाने शेती अल्पदरात देण्यात आल्या. त्याबदल्यात काही लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्यावेळेस गावकऱ्यांनी कोणताही दुष्परिणाम न लक्षात घेता स्वागतच केले. कारखाने सुरू झाले. उत्पादनही कोट्यवधीचे होऊ लागले. मात्र त्याप्रमाणे येथील गावांचा आणि स्थानिक नागरिकांना कुशल कामगार म्हणून नेमण्यास आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली.

काही स्थानिक कामगारांनी १५ वर्ष संघर्ष करून आपला लढा पूर्णत्वास नेला. आजही काही कारखान्यात अशा प्रकारची विदारक स्थिती दिसून येते की जमीन अल्पदरात घेऊन नोकरी कबुल केली. मात्र अजूनही कुशल कामगार म्हणून घेण्यात आले नाही. स्थानिक कामगारांना डावलण्यात येते. त्यांच्यावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो आणि परप्रांतीयांचा भरणा केला जातो. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांंची फळी पडलेली असून, त्यांचा हाताला काम नाही.

अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शहरांमध्ये तुटपुंजा मानधनावर काम करत आहे. तांत्रिक युवक आपल्याला स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळेल, या आशेवर जगत आहेत. परंतु कारखान्यात असलेल्या रिक्त जागांवर व विविध पदांवर परप्रांतीय लोकांना वाव देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तेव्हा या तालुक्यातील स्थानिक बेरोजगार युवकांचा फायदा तरी काय, असा प्रश्न बेरोजगार युवक करीत आहे.

बॉक्स

अजूनही रोटेशन पद्धतीवरच काम

आजही काही कारखान्यात रोटेशन तत्त्वावर कामगार काम करत आहेत. त्यांना कधी कामावर घेतले जाते, तर कधी १५ दिवसातून एकदा कामावर घेतले जाते. त्यामुळे अशा लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. कामगारांच्या हाताला काम नसल्याने ते भाजीपाला, घर बांधकाम आणि ट्रॅक्टरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवीत आहेत.

बॉक्स

कामगार संघ नावापुरतेच

आपला हेतू साध्य करण्याकरिता आणि हित जोपासण्याकरिता कारखान्यामध्ये कामगार संघ स्थापन केले आहे. परंतु ते फक्त नाममात्र झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय लोकांचा भरणा वाढतच चालला आहे. या सर्व समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कायमचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. एकीकडे शासन ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य या तत्त्वावर कारखान्यांना परवानगी देत असले तरी त्या भागातील युवकांचा भ्रमनिरास होत असून, बेरोजगारीचा प्रश्न जटिल होत आहे.