शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजमधून चंद्रपूर जिल्ह्याला किती मिळणार नुकसान भरपाई ? जाचक अट टाळून सरसकट भरपाई देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:50 IST

Chandrapur : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. यातील किती वाटा जिल्ह्याला मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागात ६५ मिलिमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी (दि. ८) दिली.

राज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह २९ जिल्हे प्रभावित झाले. राज्य शासनाने ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये, तर बागायतीसाठी प्रतिहेक्टरी ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके दिली.

कर्जवसुलीला हवी स्थगिती

जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिल माफीआधीच, शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलती लागू होणार आहेत. जिल्ह्यातील बरेच शेतकरी कर्जात आहेत. राज्य शासनाने या वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

१२ कोटी ५३ लाखांचा प्रस्ताव सादर

जून-जुलै २०२५ मध्ये अतिवृष्टीने २८९ गावातील ८६२१.०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. बाधित शेतकरी संख्या १३ हजार ७४२ आहे. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ७कोटी ३२ लाख ९९ हजार ४१४ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान वाटप संगणकीय प्रणाली प्रक्रियेद्वारे सुरू आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४,२७५.२४ हेक्टर जमीन बाधित झाली. यामध्ये १६ हजार ९३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासाठी मागील आठवड्यात १२ कोटी ५३ लाख ३७ हजार ६८० रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. अनुदान प्राप्त होताच तत्काळ मदत वाटप करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur District Flood Relief: Blanket Compensation Promised, No Strict Criteria

Web Summary : Chandrapur farmers will receive blanket flood compensation, assures Guardian Minister Uikey. The government aims to disburse aid before Diwali. ₹12.53 crore proposal submitted for August's flood damage. Previous aid distribution is underway. Loan recovery stays sought.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र