शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:16 IST

पाच हजार शेतकऱ्यांना फटका : पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर व वरोरा तालुक्यात ६९२.२५ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. याचा एकूण ४ हजार ९९२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी बुधवारी (दि. २४) शेतीची पाहणी करून नुकसानीची स्थिती जाणून घेतली.

चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक, वाहनगाव येथील बालाजी जुगनाके, बोथलीचे नितीन खापणे, खामगावच्या शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु) येथील प्रफुल्ल सोनकर, भेंडाळाचे संजय उरकुडे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाधित शेतमालाची पाहणी केली. चिमूर तालुक्यात पाहणीदरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील पाहणीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.

असे आहे नुकसानीचे स्वरूप

अतिवृष्टीने चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या ३ हजार ४१८ आहे. वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र ५९२.२५ हेक्टर आणि बाधित शेतकरी संख्या १ हजार ४०८ आहे.

जून व ऑगस्टच्या भरपाईपासून जिल्ह्याला वगळले

जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुराने नुकसान झाले होते. मात्र, राज्य शासनाने मंगळवारी (दि. २३) जाहीर केलेल्या भरपाईपासून चंद्रपूर जिल्ह्याला वगळल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पीक नुकसानीसाठी राज्यात १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांची भरपाई मंजूर झाली. यात नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यांचा समावेश केला. मात्र, याच कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य शासनाने भरपाईपासून वगळल्याने पंचनाम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ- पालकमंत्री डॉ. अशोक उईके

अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ शासनास पाठवला जाईल. शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

सप्टेंबरचे पंचनामे सुरू- आशिष जयस्वाल

सोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागांत कटाईलाही परवडणार नाही. मागील महिन्याच्या भरपाईचा निर्णय झाला. सप्टेंबरच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. नुकसानीचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी पाहणीदरम्यान दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Heavy Rains Damage Crops; Ministers Assess Farmer Losses

Web Summary : Heavy rains in Chandrapur's Chimur and Warora talukas damaged crops across thousands of hectares, affecting nearly 5,000 farmers. Ministers Uike and Jaiswal inspected the damage, promising compensation. The district was excluded from prior compensation, causing farmer discontent.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीfloodपूरAshok Uikeअशोक उइकेAshish Jaiswalआशीष जयस्वाल