शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:16 IST

पाच हजार शेतकऱ्यांना फटका : पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर व वरोरा तालुक्यात ६९२.२५ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. याचा एकूण ४ हजार ९९२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी बुधवारी (दि. २४) शेतीची पाहणी करून नुकसानीची स्थिती जाणून घेतली.

चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक, वाहनगाव येथील बालाजी जुगनाके, बोथलीचे नितीन खापणे, खामगावच्या शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु) येथील प्रफुल्ल सोनकर, भेंडाळाचे संजय उरकुडे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाधित शेतमालाची पाहणी केली. चिमूर तालुक्यात पाहणीदरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील पाहणीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.

असे आहे नुकसानीचे स्वरूप

अतिवृष्टीने चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या ३ हजार ४१८ आहे. वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र ५९२.२५ हेक्टर आणि बाधित शेतकरी संख्या १ हजार ४०८ आहे.

जून व ऑगस्टच्या भरपाईपासून जिल्ह्याला वगळले

जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुराने नुकसान झाले होते. मात्र, राज्य शासनाने मंगळवारी (दि. २३) जाहीर केलेल्या भरपाईपासून चंद्रपूर जिल्ह्याला वगळल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पीक नुकसानीसाठी राज्यात १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांची भरपाई मंजूर झाली. यात नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यांचा समावेश केला. मात्र, याच कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य शासनाने भरपाईपासून वगळल्याने पंचनाम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ- पालकमंत्री डॉ. अशोक उईके

अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ शासनास पाठवला जाईल. शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

सप्टेंबरचे पंचनामे सुरू- आशिष जयस्वाल

सोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागांत कटाईलाही परवडणार नाही. मागील महिन्याच्या भरपाईचा निर्णय झाला. सप्टेंबरच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. नुकसानीचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी पाहणीदरम्यान दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Heavy Rains Damage Crops; Ministers Assess Farmer Losses

Web Summary : Heavy rains in Chandrapur's Chimur and Warora talukas damaged crops across thousands of hectares, affecting nearly 5,000 farmers. Ministers Uike and Jaiswal inspected the damage, promising compensation. The district was excluded from prior compensation, causing farmer discontent.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीfloodपूरAshok Uikeअशोक उइकेAshish Jaiswalआशीष जयस्वाल