शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

पंचायत समितीवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:44 PM

तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई : महिलांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.पारडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोला गावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, ही योजना पूर्णत्वास न आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाच्या दिवसात खासगी हातपंप अधिग्रहीत करुन पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, आता पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, या मागणीसाठी महिलांनी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.यावेळी संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मोर्चात नारायण हिवकर, देवराव गेडाम, सोनू राजूरकर, शीला सोयाम, अर्चना जेऊरकर, राजू कोट्टावार, रमेश तुरणकर, सुधाकर न्याहारे, प्रवीण हंसकर, सत्यवान जेऊरकर, नीलेश जेऊरकर, प्रभावती न्याहारे, वैशाली न्याहरे, मनिषा धारतकर, अर्चना कुळमेथे, करिश्मा सोयाम, अनिता टोंगे, नंदा बोरकर, माधुरी हंसकर, शोभा तुरणकर, पुष्पा राजूरकर, साधना राजूरकर आदी सहभागी झाले होते.सावलीतील फिल्टर नळ योजना बंदसावली : जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरु असलेली फिल्टर नळ योजना पुन्हा मागील पंधरा दिवसांपासून ठप्प झाली. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. ढिसाळ कारभाराचा हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. त्यात जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून फिल्टर नळ योजना आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून फिल्टर नळ योजना ही सतत बंद पडत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. मात्र, सर्वांना पाणी पुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. फिल्टर नळ योजना केवळ सहा महिने चालते. उर्वरीत सहा तांत्रिक बिघाडाने बंद असते, पाणी पुरवठा बंद असला तरी पाणीपट्टी वसुली करण्याचे काम नगरपंचायत करीत आहे. ही नळ योजना सावलीकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशा गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष घालून फिल्टरची नळयोजना पूर्ववत सुरळीत सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चा