शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

चंद्रपुरातील बागेची नासधूस

By admin | Updated: July 17, 2015 00:50 IST

स्थानिक नागपूर महामार्गावरील खत्री-पोटदुखे लेआऊटजवळील खुल्या जागेवर नागरिकांनी गेल्या सहा वर्षांपासून बगिचा तयार केला.

चंद्रपूर : स्थानिक नागपूर महामार्गावरील खत्री-पोटदुखे लेआऊटजवळील खुल्या जागेवर नागरिकांनी गेल्या सहा वर्षांपासून बगिचा तयार केला. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी बगिच्याची नासधूस करुन झाडांची कत्तल केली. याप्रकरणी येथील रहिवाश्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.स्थानिक जनता बी.एड महाविद्यालयासमोरील खत्री- पोटदुखे लेआऊटलगतच्या पश्चिम बाजूला असलेल्या खुल्या जागेवर येथील रहिवाश्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून बगीचा तयार केला. बगीच्यात परिसरातील नागरिक विरंगुळा म्हणून सकाळ-संध्याकाळी फिरायला जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा बगीचा एक पर्वणीच ठरला आहे. बगीचाला लागूनच इदगाहाचे पवित्र राखण्यासाठीही बगीचा मोलाचा ठरत आहे. मागील सहा वर्षांपासून या बगीचाची देखभाल येथील नागरिक करीत आहेत. मात्र मंगळवारच्या रात्री अज्ञात समाजकंटकांनी या बगिचातील झाडांची कत्तल करुन तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. समाजकंटकाविरुद्ध कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.सोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा या प्रकरणात दखल द्यावी याकरीता निवेदन देण्यात आले आहे. यावेळी डॉ. सुनील भट, शंभु कुमावत, अनिल काळे, श्रीधर दत्तात्रेय, सुरेश ठावरी, दादाजी चल्लावार, के. आर. देवाळे, कमला जाखोटिया, नाहीन शेख, प्रसाद तामण, रविंद्र सिंग सलुजा, मुसानी, बी. टी. गुंबडे, बी. के. दोषी, जे. पी. बाहेश्वार, पियूष दत्तात्रेय, प्रविण साखरकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)