शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:00 AM

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देमिळेल त्या मार्गाने पिकांना दिले जात आहे पाणी

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : धानाचे पीक अंतिम टप्प्यात येत असतानाच पावसाने डोळे वटारल्याने धानाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धडपड सुरू झाली आहे. मिळेल त्या मार्गाने व मिळेल त्या साधनाने पाणी कसे मिळेल व धान कसे वाचेल, याच विवंचनेत या शेतकरी आहेत.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात धान गर्भावस्थेत येण्याचा काळ सुरू होईल. आणि नेमक्या याच वेळेस धानास पाण्याची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने घुमजाव केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी नाले, विहिरी या स्त्रोतातून आॅईल इंजिन, मोटरपंप याद्वारे पाणी घेऊन पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत.उत्पादनावर परिणाम होणारज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे किंवा शेताजवळ नाला आहे, असे शेतकरी साधनांचा वापर करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात असले तरी ज्या शेतकऱ्यांना अशी कोणतीही सोय नाही, अशा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार बसून त्याचा परिणाम उत्पादनावर निश्चित होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प