शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सरकारकडून उपेक्षाच

By admin | Updated: October 10, 2016 00:38 IST

महिला बचतगटाला आत्मनिर्भर बनविण्याचे खरे कार्य सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या काळात झाले आहे.

अशोक चव्हाण यांचा आरोप : महिला बचत गट मेळावाचंद्रपूर : महिला बचतगटाला आत्मनिर्भर बनविण्याचे खरे कार्य सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या काळात झाले आहे. गटाला चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले. परंतु सत्तेवर येताच भाजप सरकारने महिला बचतगटाला सक्षमीकरण करण्याऐवजी सवलतीच्या योजना बंद करून त्यांना वेठीस धरले आहे. दुष्काळाच्या काळात कर्जमाफी दूर परंतु उत्पादित मालाही योग्य दर दिला नाही. त्यामुळे तो हवालदिल झाला आहे. त्यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे महिला व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शासनाला धडा शिकवण्याचा निर्धार करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी व महिला बचतगट मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस कमिटी सचिव प्रमोद तितरमारे, माजी आ. सुभाष धोटे, प्रदेश महासचिव झिया पटेल, प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, ज्येष्ठ नेत्या रजनी हजारे, विजया बांगडे, डॉ.आसावरी देवतळे, चंद्रपूर विधानसभा महेश मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदींची उपस्थिती होती.खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, काँग्रेसने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण घोषित करून ग्रामीण सत्तेची चाबी सोपविली आहे. त्यांना आत्मसन्मान प्रदान केला. लोकसभेतही तिचा योग्य गौरव व्हावा म्हणून आरक्षण देण्याची सोनिया गांधी यांची भूमिका आहे. आज देशात व राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहे. दुष्काळस्थितीतही त्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजपा सकारकडून होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गतवर्षी धानाला दोन हजारपेक्षाही हमीभाव दिल्याने उत्पादन खर्चही निघू शकला नसल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे.अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचत गटांना पूर्वीप्रमाणेच चार टक्के व्याज दराने सवलतीने कर्ज देण्याचे बचत गटांच्या महिलांना दिले होते. परंतु आश्वासन पाळले नसल्याने गटाला १० टक्के व्याज दर द्यावा लागत आहे. त्यामुळे महिलांचा विश्वास फडणवीस सरकारने गमावले असल्याचा आरोप खा. चव्हाण यांनी यावेळी केला.माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी निवडणुकीच्या काळात गोरगरीब व शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळता येत नसेल तर भाजपा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची टिका यावेळी केली.भाजपा सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला असल्याने सामान्यमाणसाच्या ताटातील तुरीची डाळ गायब झाली. धानाला भाव नाही. याउलट केवळ प्रस्थापित व्यवस्थेचे लाड पुरविण्यातच राज्य सरकारला स्वारस्य आहे. चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतेत सापडला आहे. या ठिकाणी ओला दुष्काळ घोषित न झाल्यास शेतकऱ्यांचे जगणे आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काँग्रेसने ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेहमीच गोरगरीब व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारे कुणी नसल्याने आता पेटून उठण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केले.प्रारंभी आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहराव पाऊणकर यांनी महिला व शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मेळाव्याला जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटाच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)