शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांचे आंदोलन

By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST

आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले

दुर्गापूर : आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ त्यांची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी चालकांच्या कुटुंबियांनी वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीच्या कार्यालयापुढे शुक्रवारी धरणे आंदोलन केले. मात्र अद्यापही त्यांची सुटका न झाल्याने सदर प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.
वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीतील कोळसा इतरत्र वाहून नेण्याचे कंत्राट तीन फौजी कंपन्यांना देण्यात आले आहे. यात हेमकुंड, शंखमुगम, तेरावाली या ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आपले ट्रक चालविण्यासाठी चालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर ट्रक चालकांना कोल इंडिया हाय पॉवर कमेटी कलकत्ताद्वारे वर्ष २०१३ मध्ये किमान वेतन श्रेणी ठरवून दिली. मात्र या खासगी कोळसा वाहून नेणाऱ्या फौजी कंपन्या किमान वेतन न देता आपल्या मनमर्जीनुसार वेतन देऊन त्यांच्यावर अन्याय करीत होत्या. तसेच त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करवून घेण्यात येत होते. काही चालकांना या कंपन्यांनी क्षुल्लक कारणावरून कामावरून काढुन टाकले होते. म्हणून या कंपन्यात कार्यरत वाहन चालकांनी कंपन्यांविरूद्ध कामबंद करून आपल्याला न्याय मिळावा, यासाठी १० डिसेंबरला उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे संप पुकारला. त्यामुळे त्या दिवशी खाणीतील कोळसा इतरत्र जाऊ शकला नाही. ताबडतोब या कंपन्यांनी १२ डिसेंबरला नवीन वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या व त्यांच्याद्वारे कोळसा वाहुन नेण्याचे काम सुरू केले.
यास जुन्या वाहन चालकांनी विरोध करून परत काम बंद पाडल्याने सदर कोळसा वाहू कंपन्यांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तब्बल ८१ चालकांना अटक केली व न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर व नागपूर कारागृहात त्यांची रवानगी केली.
१२ डिसेंबरला त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुला-मुलींनी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे धरणे देऊन त्यांच्यावर लावलेल्या कलमा व त्यांची तात्काळ सुटका करण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यांच्या समवेत बीएमएस संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र अद्यापही सदर चालकांची सुटका झाली नाही. यापुढे हे आंदोलन तिव्र करण्याचा त्यांच्या कुटुंबियांनी इशारा दिला आहे. (वार्ताहर)