शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे विजयी उमेदवारांंच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य लहान पक्षांनीही यंदाच्या निवडणुकीत ...

ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य लहान पक्षांनीही यंदाच्या निवडणुकीत पडद्यामागून सूत्रे हलविली. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांनीही बहुसंख्य ग्रामपंचायतींवर आपणच वर्चस्व मिळविल्याचा दावा केला. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झालेल्या यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत तसेच जवळपास सम प्रमाणात जागा जिंकणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या कमीच आहे. नियमानुसार एकूण सदस्य संख्या ११ पैकी एका पॅनलचे ७ सदस्य निवडून आल्यास बहुमत मिळते. यातील एका सक्षम सदस्याची सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवड होते. मात्र, ११ सदस्यांपैकी एका पॅनेलचे ६ आणि दुसऱ्या पॅनेलचे ५ सदस्य विजयी झाल्यास सरपंचपदासाठी घोडेबाजार होऊ शकतो. जिल्ह्यात अशा ग्रामपंचायतींची संख्या बरीच आहे. यातून एकमेकांच्या पॅनेलमधील सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. सदस्यांना प्रलोभने दाखवली जातात. सरपंद पदाचा अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत अज्ञातस्थळी नेण्याचे प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीतही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मतदानाचे तीन पर्याय

सरपंचपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर अशावेळी हजर सदस्यांचे मतदान घेण्याचा नियम आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित सदस्यांचे आवाजी, हात वर करून किंवा गोपनीय चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात. मतमोजणी झाल्यानंतर जास्त मते मिळवणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

जिल्हा प्रशासनाची आज बैठक

जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुकीचा अहवाल लवकरच साद करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ३० दिवसात जाहीर करण्याची मुदत आहे. मात्र, येत्या १० दिवसातच अंतिम निर्णय होऊ शकतो. ग्रा. पं. निवडणुकीसंदर्भात बुधवारी जिल्हा प्रशासनाची बैठक होणार आहे.