शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: November 2, 2016 00:53 IST

मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ...

मासिक, त्रैमासिक बैठकीवर बहिष्कार : आजपासून असहकार आंदोलनचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून जिल्हाभरातील पंचायत समितीसमोर असहकार आंदोलन पुकारले आहे.ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र दखलच घेतली जात नाही, असा आरोप आहे. शासनाचा दूत या नात्याने ग्रामीण भागात विकासाचे कार्य करुनही प्रशासनाकडून असमानतेची वागणूक मिळत आहे, ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढाऱ्याच्या मधे भरडला जात आहे. यातून ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्याचाही संघटनेचा आरोप आहे. वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार आणि वाटाघाटी करुनही समस्या कायम आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारीत असहकार आंदोलन करणार असल्याचे यापूर्वीच मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामविकास मंत्रालयाला कळविले होते.निवेदनामध्ये मांडलेल्या समस्यापैकी सन २००९ पासून ग्रामसेवक संवर्गाला सेवेत कायम न करणे, कंत्राटी ग्रामसेवकाची अनामत रक्कम परत न करणे, डीसीपीएसची कपात केलेल्या रकमेच्या पावत्या न मिळणे, महात्मा गांधी, मग्रारोयोची कामे केवळ ग्रामसेवकावर थोपविणे, ग्रामसेवकाने केलेल्या कामावर नजरचुकीने अनियमितता झाल्यास ग्रामसेवकावर कारवाई करणे, वैयक्तिक शौचालयाच्या बांधकांमाची ग्रामसेवकावर सक्ती न करणे, कालबद्ध पदोन्नती प्रथम, द्वितीय लागू न करणे, ग्रामसेवकाचे सेवापुस्तके अद्यावत करणे, चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन सुरु आहे. त्यावर कुठलीही कारवाई न करणे, प्रत्येक तालुक्यात ई टेंडरीगची सुविधा करणे, चिमूर पंचायत समितीच्या ग्रामसेवकांचे (एमआरईजीएस) पूर्व सूचना व लेखी कारण न मागविता त्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम परत करावी, या विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक युनियनने दिलेल्या निवेदनात आंदोलनादरम्यान ग्रामसेवक शासनाच्या मासिक, त्रैमासिक बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र ग्रामपंचायतीमध्ये राहून जनतेची कामे करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ग्रामसेवकाच्या जिल्ह्यातील या असहकार आंदोलनामुळे प्रशासनाच्या योजना व माहिती जनतेपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आंदोलनाचे टप्पेजिल्हाभरातील ग्रामसेवक कोणत्याही मासिक, पाक्षिक, पं.स. व जि.प. स्तरावरील इतर कोणत्याही आढावा सभेला बसणार नाहीत. जन्म, मृत्यू, पाणी टंचाई व निवडणूक ही कामे वगळता अहवाल सादर करणार नाहीत. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासनीस वरिष्ठ अधिकाऱ्यास रेकार्ड उपलब्ध करुन देणार नाहीत.या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील ७३५ (अंदाजे) ग्रामसेवक सहभागी आहेत. प्रशासनाला या मागण्याचे अनेकदा निवेदन दिले आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलनादरम्यान जनतेची कामे करण्यात येणार असून प्रशासनास अहवाल देणार नाही. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.- पद्माकर अल्लीवार, जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन जिल्हा चंद्रपूर