शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
5
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
6
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
7
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
8
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
9
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
10
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
11
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
12
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
13
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
14
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
15
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
16
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
17
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
18
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
19
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
20
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं

संचारबंदीच्या काळात साडेतेवीस हजार पॉझिटिव्ह, १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST

चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये ...

चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिनांक १५ एप्रिल ते १ मे या दरम्यान जिल्ह्यात ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर याच कालावधीत १४ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत रुग्णांच्या मृत्यूंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केेले होते. दरम्यान, राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. केवळ सकाळी ७ ते ११ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. याव्यतिरिक्त सर्वच प्रतिष्ठाने व दुकाने बंद आहेत. परंतु, तरीसुद्धा रुग्णसंख्येत घसरण झाली नाही. १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत २३ हजार ५२० बाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८ हजार ६९० चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८,९९६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३,५१० जण कोरोनामुक्त झाले.

बॉक्स

या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी करण्यात आली असूनही अद्यापही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८,६९० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार ९९६ बाधित आढळून आले तर १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० बाधित आढळून आले.

बॉक्स

बेफिकिरीने वाढले ग्रामीण भागात रुग्ण

चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील रुग्णसंख्याही प्रचंड वाढत आहे. ४ मेपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या ६५ हजार ३८ बाधितांपैकी शहरी भागात २४,४५० रुग्णसंख्या ग्रामीण भागात आढळून आली. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ते बेफिकिरीने वागत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर आदींकडे दुर्लक्ष करतात. अद्यापही ग्रामीण भागात विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम होत आहेत.