शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

संचारबंदीच्या काळात साडेतेवीस हजार पॉझिटिव्ह, १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST

चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये ...

चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिनांक १५ एप्रिल ते १ मे या दरम्यान जिल्ह्यात ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर याच कालावधीत १४ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत रुग्णांच्या मृत्यूंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केेले होते. दरम्यान, राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. केवळ सकाळी ७ ते ११ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. याव्यतिरिक्त सर्वच प्रतिष्ठाने व दुकाने बंद आहेत. परंतु, तरीसुद्धा रुग्णसंख्येत घसरण झाली नाही. १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत २३ हजार ५२० बाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८ हजार ६९० चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८,९९६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३,५१० जण कोरोनामुक्त झाले.

बॉक्स

या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी करण्यात आली असूनही अद्यापही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८,६९० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार ९९६ बाधित आढळून आले तर १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० बाधित आढळून आले.

बॉक्स

बेफिकिरीने वाढले ग्रामीण भागात रुग्ण

चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील रुग्णसंख्याही प्रचंड वाढत आहे. ४ मेपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या ६५ हजार ३८ बाधितांपैकी शहरी भागात २४,४५० रुग्णसंख्या ग्रामीण भागात आढळून आली. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ते बेफिकिरीने वागत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर आदींकडे दुर्लक्ष करतात. अद्यापही ग्रामीण भागात विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम होत आहेत.