शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

स्वहितासाठी संचालकच करताहेत बदनामी

By admin | Updated: December 13, 2014 22:35 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे,

शेखर धोटे म्हणतात : आपला कार्यकाळ इतरांहून चांगलाच
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष धोटे यांनी बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे आणि कार्यप्रणालीचे दाखले देत विरोधकांवर टीका केली. यावेळी उपाध्यक्ष प्रभा वासाडे, संचालक संजय सिंगम, मनोहर पाऊणकर, पुंडलिक कढव, संजय तोटावार, अनिल खनके, डॉ. अनिल वाढई, यशवंत दिघोरे उपस्थित होते. आरोपकर्त्या संचालकाचा नामोल्लेख टाळून धोटे म्हणाले, बँकेतील कर्मचारी भरतीमध्ये देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे. मात्र या आरोपात सहभागी असलेले संचालकच स्वत: भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत.
या बँकेत मार्च २००९ मध्ये १३८ आणि आॅगस्ट २००९ मध्ये ९२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नव्या पदांमुळे बँकेवर आर्थिक भार पडला. प्रत्यक्षात २००८ आणि २००९ मधील सरळ सेवा भरतीदरम्यान अनुकंपाधारकांचा हक्क डावलण्यात आला.
२००९ मधील भरतीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आजही न्यायालयात सुरू आहे. या काळात स्वत: रवींद्र शिंदे अध्यक्ष होते. मात्र आपल्या कार्यकाळात आपण बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता आणली. त्यासाठी समिती गठीत केली. त्यात बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांसह रवींद्र शिंदे, नंदा अल्लूरवार यांच्यासह अन्य संचालकही सदस्य आहेत. या प्रकरणी कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. आपला वयैक्तिक विरोध असेल तर तो वैयक्तिक पातळीवर व्हावा, मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला या बदनामीमुळे तडा जाऊ नये, एवढीच आपली अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)