शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

पक्ष्यांच्या विविध प्रजाती नामशेष होताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:16 IST

नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : वनविभागाने लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्राच्या सहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाका. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. विविध पक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीची गरज आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे त्याचा परिणाम एकंदरीत ऋतु चक्रावर होत आहे.कडक उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम पक्ष्याच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सामान्यत: सिंदेवाहीत कावळे, गिधाड, खार, घुबड, लाल पंख असलेले कावळे, मैना, घोरपड, रानकोंबडे, पोपट, देवपक्षी, कवडी, लावे, तितीर, पिंजरा, सुतार पक्षी, कोकीळ, सारस, सुगरण, पान बुडी, ढोकरी, सातभाई, सहाढोक सूर्यपक्षी हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.मार्च ते जुलै विणीचा काळसाधारणपणे मार्च ते जुलै या महिन्यात पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल यामुळे पक्ष्यांची प्रसव प्रक्रिया प्रभावित होत असल्याने प्रजननावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निसर्गाचा सफाई कामगार समजला जाणारा गिधाड हा पक्षी दिसेनासा होत चालला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे तसेच पाण्याअभावी त्यांची संख्या रोडावली आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे. ग्लोबल वार्मींगसोबत वाढते शहरीकरणही या पक्ष्यांच्या मुळावर घाला घालत आहेत.प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवामाणूस आपली तहान कशाही प्रकारे भागवत असला तरी प्राणी-पक्ष्यांना मात्र यासाठी जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी अंगणात सावलीमध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी मित्रांकडून करण्यात येत आहे. काही पक्षिमित्र दरवर्षी पाण्याची मातीची भांडी आणि पक्ष्यांसाठी घरट्याचे वितरण करीत आहेत. पेटगाव येथील पक्षिमित्र तथा शिक्षक पुंडलिक बावणे हे दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडावर पक्ष्यांचे घरटे ठेवतात. त्यामध्ये पक्ष्यांना राहण्यासाठी व पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की ते घरट्यामध्ये पाणी टाकतात. त्यामुळे झाडावर विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलात मानवाचा वाढता वावर, तलावाचे सौंदर्यीकरण आदी प्रकारामुळे पक्ष्यांची काही प्रजाती कमी होत आहेत. पूर्वी घरात चिमण्यांची घरटी असायची. आता घरांचे रुप बदलले आहे. त्यामुळे चिमण्यांची घरटी दिसत नाही. जलाशयाजवळ असणाऱ्या पक्ष्यांचीही संख्या आता कमी होत आहे.- प्रकाश कामडे,पक्षीमित्र, चंद्रपूर.