शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पक्ष्यांच्या विविध प्रजाती नामशेष होताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:16 IST

नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : वनविभागाने लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्राच्या सहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाका. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. विविध पक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीची गरज आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे त्याचा परिणाम एकंदरीत ऋतु चक्रावर होत आहे.कडक उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम पक्ष्याच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सामान्यत: सिंदेवाहीत कावळे, गिधाड, खार, घुबड, लाल पंख असलेले कावळे, मैना, घोरपड, रानकोंबडे, पोपट, देवपक्षी, कवडी, लावे, तितीर, पिंजरा, सुतार पक्षी, कोकीळ, सारस, सुगरण, पान बुडी, ढोकरी, सातभाई, सहाढोक सूर्यपक्षी हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.मार्च ते जुलै विणीचा काळसाधारणपणे मार्च ते जुलै या महिन्यात पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल यामुळे पक्ष्यांची प्रसव प्रक्रिया प्रभावित होत असल्याने प्रजननावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निसर्गाचा सफाई कामगार समजला जाणारा गिधाड हा पक्षी दिसेनासा होत चालला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे तसेच पाण्याअभावी त्यांची संख्या रोडावली आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे. ग्लोबल वार्मींगसोबत वाढते शहरीकरणही या पक्ष्यांच्या मुळावर घाला घालत आहेत.प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवामाणूस आपली तहान कशाही प्रकारे भागवत असला तरी प्राणी-पक्ष्यांना मात्र यासाठी जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी अंगणात सावलीमध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी मित्रांकडून करण्यात येत आहे. काही पक्षिमित्र दरवर्षी पाण्याची मातीची भांडी आणि पक्ष्यांसाठी घरट्याचे वितरण करीत आहेत. पेटगाव येथील पक्षिमित्र तथा शिक्षक पुंडलिक बावणे हे दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडावर पक्ष्यांचे घरटे ठेवतात. त्यामध्ये पक्ष्यांना राहण्यासाठी व पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की ते घरट्यामध्ये पाणी टाकतात. त्यामुळे झाडावर विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलात मानवाचा वाढता वावर, तलावाचे सौंदर्यीकरण आदी प्रकारामुळे पक्ष्यांची काही प्रजाती कमी होत आहेत. पूर्वी घरात चिमण्यांची घरटी असायची. आता घरांचे रुप बदलले आहे. त्यामुळे चिमण्यांची घरटी दिसत नाही. जलाशयाजवळ असणाऱ्या पक्ष्यांचीही संख्या आता कमी होत आहे.- प्रकाश कामडे,पक्षीमित्र, चंद्रपूर.