शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पक्ष्यांच्या विविध प्रजाती नामशेष होताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:16 IST

नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : वनविभागाने लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्राच्या सहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाका. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. विविध पक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीची गरज आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे त्याचा परिणाम एकंदरीत ऋतु चक्रावर होत आहे.कडक उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम पक्ष्याच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सामान्यत: सिंदेवाहीत कावळे, गिधाड, खार, घुबड, लाल पंख असलेले कावळे, मैना, घोरपड, रानकोंबडे, पोपट, देवपक्षी, कवडी, लावे, तितीर, पिंजरा, सुतार पक्षी, कोकीळ, सारस, सुगरण, पान बुडी, ढोकरी, सातभाई, सहाढोक सूर्यपक्षी हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.मार्च ते जुलै विणीचा काळसाधारणपणे मार्च ते जुलै या महिन्यात पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल यामुळे पक्ष्यांची प्रसव प्रक्रिया प्रभावित होत असल्याने प्रजननावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निसर्गाचा सफाई कामगार समजला जाणारा गिधाड हा पक्षी दिसेनासा होत चालला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे तसेच पाण्याअभावी त्यांची संख्या रोडावली आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे. ग्लोबल वार्मींगसोबत वाढते शहरीकरणही या पक्ष्यांच्या मुळावर घाला घालत आहेत.प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवामाणूस आपली तहान कशाही प्रकारे भागवत असला तरी प्राणी-पक्ष्यांना मात्र यासाठी जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी अंगणात सावलीमध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी मित्रांकडून करण्यात येत आहे. काही पक्षिमित्र दरवर्षी पाण्याची मातीची भांडी आणि पक्ष्यांसाठी घरट्याचे वितरण करीत आहेत. पेटगाव येथील पक्षिमित्र तथा शिक्षक पुंडलिक बावणे हे दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडावर पक्ष्यांचे घरटे ठेवतात. त्यामध्ये पक्ष्यांना राहण्यासाठी व पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की ते घरट्यामध्ये पाणी टाकतात. त्यामुळे झाडावर विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलात मानवाचा वाढता वावर, तलावाचे सौंदर्यीकरण आदी प्रकारामुळे पक्ष्यांची काही प्रजाती कमी होत आहेत. पूर्वी घरात चिमण्यांची घरटी असायची. आता घरांचे रुप बदलले आहे. त्यामुळे चिमण्यांची घरटी दिसत नाही. जलाशयाजवळ असणाऱ्या पक्ष्यांचीही संख्या आता कमी होत आहे.- प्रकाश कामडे,पक्षीमित्र, चंद्रपूर.