शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांना मिळते तुंटपुंजे मानधन

By admin | Updated: December 13, 2014 01:24 IST

संगणक परिचालकांवर अन्याय होऊ नये, हा दृष्टिकोन ठेवून स्वतंत्र व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीतील तेराव्या वित्त आयोगातून मानधनाची व्यवस्था केली जाते.


नागरी (रेल्वे) : संगणक परिचालकांवर अन्याय होऊ नये, हा दृष्टिकोन ठेवून स्वतंत्र व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीतील तेराव्या वित्त आयोगातून मानधनाची व्यवस्था केली जाते. दर महिन्याला आठ हजार रुपये कपात करुन जिल्हा परिषदेमार्फत महाआॅनलाईन कंपनीकडे वर्ग केल्या जाते. त्यानंतर महाआॅनलाईन कंपनीकडून संगणक परिचालकांना अतिशय अल्प मानधन दिले जात आहे.
ई-पंचायतीमध्ये संस्थांची संकेतस्थळे विकसित करण्यासाठी संग्राम केंद्रातून ग्रामस्थांना विविध सेवा सुविध उपलब्ध करुन देण्यासाठी कंत्राटी सेवेवर संगणक परिचालक परिश्रम घेत आहे. त्याच परिश्रमाचे फलीत म्हणून महाराष्ट्र शासनाला सलग तीनवेळा र्इं-पंचायतीचा देशपातळीवर पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा ग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत संगणक परिचालकांचा आहे. पण एवढे सगळे करुनसुद्धा या सुशिक्षित बेरोजगाराचे महाआॅनलाईन कंपनीकडून त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. केवळ तीन हजार ८०० ते चार हजार १०० रुपये एवढेच मानधन त्यांना दिले जात आहे. विशेष म्हणजे ४५० नोंदीचे टार्गेट पूर्ण करणे त्यांच्यावर बंधनकारक केले आहे.
त्याचप्रमाणे हे मानधन दर महिन्याला दिले जात नसल्याने संगण परिचालकांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. मानधनासाठी संगणक परिचालकांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. न्यायासाठी संगणक परिचालकांनी अनेकवेळा काम बंद आंदोलन करुन शासनाचा निषेध नोंदविला आहे. या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)