शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

By राजेश भोजेकर | Updated: November 24, 2023 16:20 IST

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे.

चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर-नीरी) यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचेप्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने निधी दिला आहे.   

दिनांक २२ नोव्हेंबर २३ रोजी अधिकृतपणे या करारनाम्यावर (MoA) गिरीश कुमारवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि डॉ. अमित बाफना, प्रमुख शास्त्रज्ञ सीएसआयआर-नीरी, नागपूर यांनी डॉ. विश्वजीत ठाकूर प्रमुख वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आहे. चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव प्रामुख्याने उपस्थित होते.  

या  प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता श्याम राठोड, डॉ. भूषण शिंदे, विराज चौधरी, अनिल पुनसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, क्षेत्र अधिकारी सुरेंद्र कारनकर, पूनम पोयरेवार उपस्थित होते. पर्यावरण विभागाचे अधिकारी दत्तात्रय पिंपळे (अधीक्षक अभियंता), डॉ. विजय येउल, (कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ) आणि श्रीमती माया डफाडे (वरिष्ठ. रसायनशास्त्रज्ञ)  यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. 

भारताचे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानिर्मितीचे डॉ. पी. अनबलगन, मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म),  बाळासाहेब थिटे संचालक (वित्त). अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वीज केंद्र या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे, हे विशेष.

करारामागील मुख्य कारण

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे. तथापि, कार्बन शोषणे आणि साठवणूक पद्धती तंत्रज्ञान विकसित करताना अनेक अडचणी होत्या. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती तसेच त्याचे दूरगामी परिणाम देखील अस्पष्ट होते. मात्र आता, एकपेशीय वनस्पती (अलगी/शेवाळ) वापरून कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चे जैविक कॅप्चर हे विविध औद्योगिक प्रक्रियांमधून आणि मानववंशजन्य स्त्रोतांमधून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त CO2 चा पुनर्वापर करण्यासाठी एक आकर्षक माध्यम मानले जाते.

शिवाय, एकपेशीय वनस्पतींद्वारे, CO2 कॅप्चर केले जाऊ शकते आणि जैवविविधतेमध्ये पुनर्वापर केले जाऊ शकते, ज्याचा वापर जैव ऊर्जा(बायोएनर्जी) आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या उत्पादनासाठी लिपिड तयार करण्यासाठी कार्बन स्त्रोत म्हणून केला जाऊ शकतो. भविष्यात, ही उत्पादने थेट किंवा अप्रत्यक्षपणे अन्न पुरवठा साखळी आणि पिकांवर परिणाम न करता पेट्रोलियम-साधित/पूरक वाहतूक इंधने शाश्वतपणे बदलतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणchandrapur-acचंद्रपूरpollutionप्रदूषण