शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

By राजेश भोजेकर | Updated: November 24, 2023 16:20 IST

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे.

चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर-नीरी) यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचेप्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने निधी दिला आहे.   

दिनांक २२ नोव्हेंबर २३ रोजी अधिकृतपणे या करारनाम्यावर (MoA) गिरीश कुमारवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि डॉ. अमित बाफना, प्रमुख शास्त्रज्ञ सीएसआयआर-नीरी, नागपूर यांनी डॉ. विश्वजीत ठाकूर प्रमुख वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आहे. चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव प्रामुख्याने उपस्थित होते.  

या  प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता श्याम राठोड, डॉ. भूषण शिंदे, विराज चौधरी, अनिल पुनसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, क्षेत्र अधिकारी सुरेंद्र कारनकर, पूनम पोयरेवार उपस्थित होते. पर्यावरण विभागाचे अधिकारी दत्तात्रय पिंपळे (अधीक्षक अभियंता), डॉ. विजय येउल, (कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ) आणि श्रीमती माया डफाडे (वरिष्ठ. रसायनशास्त्रज्ञ)  यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. 

भारताचे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानिर्मितीचे डॉ. पी. अनबलगन, मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म),  बाळासाहेब थिटे संचालक (वित्त). अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वीज केंद्र या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे, हे विशेष.

करारामागील मुख्य कारण

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे. तथापि, कार्बन शोषणे आणि साठवणूक पद्धती तंत्रज्ञान विकसित करताना अनेक अडचणी होत्या. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती तसेच त्याचे दूरगामी परिणाम देखील अस्पष्ट होते. मात्र आता, एकपेशीय वनस्पती (अलगी/शेवाळ) वापरून कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चे जैविक कॅप्चर हे विविध औद्योगिक प्रक्रियांमधून आणि मानववंशजन्य स्त्रोतांमधून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त CO2 चा पुनर्वापर करण्यासाठी एक आकर्षक माध्यम मानले जाते.

शिवाय, एकपेशीय वनस्पतींद्वारे, CO2 कॅप्चर केले जाऊ शकते आणि जैवविविधतेमध्ये पुनर्वापर केले जाऊ शकते, ज्याचा वापर जैव ऊर्जा(बायोएनर्जी) आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या उत्पादनासाठी लिपिड तयार करण्यासाठी कार्बन स्त्रोत म्हणून केला जाऊ शकतो. भविष्यात, ही उत्पादने थेट किंवा अप्रत्यक्षपणे अन्न पुरवठा साखळी आणि पिकांवर परिणाम न करता पेट्रोलियम-साधित/पूरक वाहतूक इंधने शाश्वतपणे बदलतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणchandrapur-acचंद्रपूरpollutionप्रदूषण