शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर गेलेल्या मतदारांवर उमेदवारांचे ""मंथन""

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST

घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यासोबतच उमेदवारांना विविध बाबींवर लक्षही द्यावे लागत आहे. ...

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यासोबतच उमेदवारांना विविध बाबींवर लक्षही द्यावे लागत आहे. यापैकी प्रमुख बाब म्हणजे कामासाठी बाहेर गेलेले मजूरही आहे. निवडणुकीच्या तारखेपर्यंत गावात येतील का ? आणि नाहीच आले तर त्यांना कसे आणता येईल, यावर उमेदवारांचे मंथन सुरू आहे.

नागभीड तालुका उद्योगविरहित आहे. म्हणूनच शेतीची कामे आटोपली की या तालुक्यातील मजूर रोजगारासाठी दरवर्षी नागपूर, वर्धा या जिल्ह्यात आणि आंध्र, तेलंगणाच्या सीमावर्ती भागात स्थलांतर करीत असतात. आतापर्यंत तालुक्यातील काही गावांतील मजुरांनी कामासाठी स्थलांतर केले असून अनेक गावांत स्थलांतराची ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे.

नागभीड तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. मात्र, यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, प्रत्येक गावातील २५ ते ५० मजुरांनी कामाच्या शोधात आतापर्यंत गावातून स्थलांतर केले आहे. मतदानाच्या तारखेपर्यंत ते परत येण्याची शक्यता नाही आणि मतदानासाठी गावी परत येऊन परत कामावर जाणे हे या मजुरांना आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही. म्हणूनच अशा मतदारांसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याची विवंचना उमेदवारांना लागून आहे.

गावातील ग्रामपंचायतींचे प्रभाग अतिशय लहान असतात. ३०० ते ४०० मतदार एका प्रभागात असतात. त्यातच एका प्रभागातून चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहत असल्याने मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणूनच बाहेर गेलेले मजूर मतदार निकालावर निश्चितच प्रभाव टाकू शकतात, याची जाणीव उमेदवारांना आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशीपर्यंत गावी कसे आणता येतील, याचे आराखडे उमेदवार करीत आहेत.

बॉक्स

खर्चाची चाचपणी

मजूर मतदार कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यातही कोणत्या तहसीलमध्ये आहेत, त्यांना गावात आणण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, गावात आल्यानंतर ते आपल्याला खरोखरच मतदान करतील का, याचा अभ्यास उमेदवार करीत असल्याची माहिती आहे.

कोट

गावात कोणतेच काम नसल्यामुळे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी मोहाळी ग्रामपंचायतमधील ५० ते ६० मजूर कामाच्या शोधात दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. आणखी काही मजूर जाण्याच्या तयारीत आहेत.

- गोपाळ दडमल, जि. प. सदस्य मोहाळी चक.