शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गावातील हालचालींवर राजकीय नेत्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत ...

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गावातील वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. विविध पदांवर असलेले अनेक पदाधिकारी आपापल्या गावातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आपलाच कार्यकर्ता निवडणुकीत जिंकून यावा, यासाठी प्रत्येक जण कामाला लागला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानली जाते. पूर्वी गावात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे गावातील नेतेच आपापले पॅनल लढवून निवडणूक लढवायचे. आताही तेच आहे. मात्र गावांकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे सुरू केले आहे आणि प्रत्येक गावात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सदस्यांसाठी सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली., तर काही पॅनलना उमेदवार शोधताना चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, उद्या अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने काहींनी मनधरणीही करणे सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक गावातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. गावाचा विकास यावरच निवडणूक लढविली जाते. त्यामुळे जो विकास करेल तोच निवडून येतो. मात्र गावात ज्यांचे राजकीय वजन जास्त त्याच नेत्याची चलती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले आहे.

-----

इच्छुकांची मनधरणी सुरू

चंद्रपूर : ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून गावातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, उद्या ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही गावात अविरोध निवडणूक होण्याची स्थिती असतानाही ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे उमेदवार अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, गावातील गटातटात राजकीय आखाडे रंगत आहेत.

---

जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये दोनच पॅनल निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे थेट आमने-सामने उमेदवार आहेत. तर काही गावात तिहेरी निवडणूक रंगणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांचा हस्तक्षेप झाल्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.