शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यात ३१ वर्षांत ३२ ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

जयंत जेनेकर कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत ...

जयंत जेनेकर

कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत चार बिट असून ६२ गावांचा कारभार पोलिसांवर आहे. या ३१ वर्षामध्ये तब्बल ३२ ठाणेदारांनी आपली सेवा देत येथील कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळली.

परिसरात लक्ष ठेवण्यासाठी निजाम काळात शेरज बू. येथे पोलीस ठाणे होते. त्यानंतर त्याचे गडचांदूरला स्थानांतर करण्यात आले आणि कन्हाळगाव येथे पोलीस चौकी देण्यात आली होती. यादरम्यान गुन्ह्याचा वाढता आलेख बघता कोरपना येथे १९८९ ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. याला आज ३१ वर्षे पूर्ण झाले आहे.

सुरुवातीला अशपाक पटेल यांच्या वाड्यातून येथील ठाण्याचा कारभार चालायचा.२००० मध्ये वणी मार्गावर ठाण्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांच्या हस्ते पार पडले. ठाण्याच्या निर्मितीपासून १६ पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला. ठाण्याचे पहिले ठाणेदार एम. वी. बाकडे तर विद्यमान ठाणेदार अरुण गुरनुले आहे. सद्यस्थितीत ६२ गावे असून कोरपना , नारंडा, वनसडी, पारडी या चार बिटामचा समावेश आहे. पूर्वी या ठाणे हद्दीत जिवती तालुक्यातील येलापूर भागातील कोटापर्यंतची गावे समाविष्ट होती. मध्यतरी ती गावे कपात करण्यात आली. यामुळे आता पूर्वेस सोनुली, पश्चिम तेलंगणा राज्य सीमा, उत्तरेस यवतमाळ जिल्हा सीमा , दक्षिणेस सावलहिरा गाव पर्यंत ठाण्याची हद्द असून या अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येक हालचालींवर येथील कर्मचारी लक्ष ठेवून आहे.

यांनी दिली सेवा

पोलीस निरीक्षक दीपक देशपांडे, पी. पी. पाटील, सेवानंद तामगाडगे, जी. बी. यादव, नानाजी ठुसे, पी. पी. परदेशी, शोभाराव शेंडे, आर. एम. यादव, ए. डी. चौधरी, व्ही. डब्ल्यू. कुवर, अशोक कोळी, किसन शेळके , गजानन विखे पाटील , पी एस परघने, एन डी कोसुरकर , अरुण गुरणुले , साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे बी. एस. खोडके , एस. ए. शेख , अनिल किनगे, एस. के. वळवी , एस व्ही. भोसले, योगेश पारधी, मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एम व्हीं बाकडे , बी बी सय्यद , पी एस धोटे , बी एम मोगल , यू. एम. सुखदेवे , आर ए वाघचौरे , जयेश भांडारकर, एस. एन. खैरनार, जे. झेड. वाळके आदींनी प्रमुख पदाचा कारभार सांभाळला.