शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Maha IT Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:52 PM

Maha IT Recruitment 2022: महा आयटी भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या...

मुंबई: रोजगाराच्या शोधात असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, एमटेक पर्यंतचे शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. महा आयटीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. नेमक्या कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया केली जात असून, त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महा आयटी कॉर्पोरेशन अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी

चीफ ऑपरेटींग ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेक/एमटेक पर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे चीफ ऑपरेटींग ऑफिसर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असावा. तसेच चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेक/एमटेक असणे आवश्यक आाहे. यासोबतच उमेदवाराकडे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असायला हवा. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२० या पत्त्यावर पाठवायचा आहे. २५ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रITमाहिती तंत्रज्ञानCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन