शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:58 IST

नांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देअनेकांना मनस्तापग्रामपंचायतींचा निधी जातोय व्यर्थतीन महिन्यात २0 लाख रूपये निधी खर्च

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये यापुर्वी २0११-१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता येण्यासाठी शासनाचा ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय व सीएससी, एसपीव्ही, ई-गव्हर्नस सव्र्हीस इंडिया लि. (केंद्र शासन प्रेरीत उपक्रम) यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रामार्फत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे विविध दाखले ऑनलाईन मिळणे तसेच ग्रामपंचायतचे रेकॉर्ड संगणकीकृत करणे तसेच जनतेच्या विविध ऑनलाईन सेवा जसे रेल्वे, बस, आरक्षण, डिटीएच रिचार्ज, बँकींग सेवा, आधारकार्ड, विमा हप्ते भरणे, इलेक्ट्रीक बील भरणे, ई-सुविधा पुरविण्यात येण्याचा मुळ उद्देश आहे. सदर आपले सरकार सेवा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जवळपास १२ हजार रूपये प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावे लागतात. तसेच प्रती महिना २७00 रूपये देखभाल दुरूस्ती खर्चही द्यावा लागतो. सदर पैशामधून सर्व प्रकारच्या सेवा पुरविणे, केंद्र चालकांना मानधन देणे, प्रिंटर, कॉम्प्युटर दुरूस्ती, पिंट्ररची शाई व कागद पुरविणे इत्यादी कामे करण्याचे प्रस्तावित असताना प्रत्यक्षात आतापर्यंत कोणत्याच ग्रामपंचायतींचे कॉम्प्युटर व प्रिंटर दुरूस्ती झालेली नसून कागद व शाई सुध्दा पुरविण्यात आलेली नाही. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतींचे दरमहा १२ हजार असे तिमाहीस ३६ हजार रूपये खर्च सुरू आहे. त्यामुळे विनाकारण होत असलेल्या या खर्चामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य त्रस्त झाले असून गावाच्या विकास कामांसाठी मिळालेला निधी अशाप्रकारे नियोजनशुन्य कारभारामुळे व्यर्थ जात असल्याने सदर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ विषयी सर्वत्र नाराजी पसरली आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे जरुरी आहे. परंतु इंटरनेट नसल्याने सदर केंद्राचा कोणताही फायदा होत नसल्याचे केंद्रचालक सांगतात. बरेचसे केंद्र चालक खाजगी इंटरनेट कॅफेवरून ग्रामपंचायतींची कामे करीत आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत तसेच ऑपरेटींग सिस्टीम अपडेट नाही. कॉम्प्युटर व प्रिंटर नादुरूस्त आहेत. त्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात. आवश्यक सुविधा पुरविल्यास कामाचा वेग वाढेल.-निलेश खुपसे,जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना.