शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:58 IST

नांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देअनेकांना मनस्तापग्रामपंचायतींचा निधी जातोय व्यर्थतीन महिन्यात २0 लाख रूपये निधी खर्च

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये यापुर्वी २0११-१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता येण्यासाठी शासनाचा ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय व सीएससी, एसपीव्ही, ई-गव्हर्नस सव्र्हीस इंडिया लि. (केंद्र शासन प्रेरीत उपक्रम) यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रामार्फत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे विविध दाखले ऑनलाईन मिळणे तसेच ग्रामपंचायतचे रेकॉर्ड संगणकीकृत करणे तसेच जनतेच्या विविध ऑनलाईन सेवा जसे रेल्वे, बस, आरक्षण, डिटीएच रिचार्ज, बँकींग सेवा, आधारकार्ड, विमा हप्ते भरणे, इलेक्ट्रीक बील भरणे, ई-सुविधा पुरविण्यात येण्याचा मुळ उद्देश आहे. सदर आपले सरकार सेवा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जवळपास १२ हजार रूपये प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावे लागतात. तसेच प्रती महिना २७00 रूपये देखभाल दुरूस्ती खर्चही द्यावा लागतो. सदर पैशामधून सर्व प्रकारच्या सेवा पुरविणे, केंद्र चालकांना मानधन देणे, प्रिंटर, कॉम्प्युटर दुरूस्ती, पिंट्ररची शाई व कागद पुरविणे इत्यादी कामे करण्याचे प्रस्तावित असताना प्रत्यक्षात आतापर्यंत कोणत्याच ग्रामपंचायतींचे कॉम्प्युटर व प्रिंटर दुरूस्ती झालेली नसून कागद व शाई सुध्दा पुरविण्यात आलेली नाही. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतींचे दरमहा १२ हजार असे तिमाहीस ३६ हजार रूपये खर्च सुरू आहे. त्यामुळे विनाकारण होत असलेल्या या खर्चामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य त्रस्त झाले असून गावाच्या विकास कामांसाठी मिळालेला निधी अशाप्रकारे नियोजनशुन्य कारभारामुळे व्यर्थ जात असल्याने सदर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ विषयी सर्वत्र नाराजी पसरली आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे जरुरी आहे. परंतु इंटरनेट नसल्याने सदर केंद्राचा कोणताही फायदा होत नसल्याचे केंद्रचालक सांगतात. बरेचसे केंद्र चालक खाजगी इंटरनेट कॅफेवरून ग्रामपंचायतींची कामे करीत आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत तसेच ऑपरेटींग सिस्टीम अपडेट नाही. कॉम्प्युटर व प्रिंटर नादुरूस्त आहेत. त्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात. आवश्यक सुविधा पुरविल्यास कामाचा वेग वाढेल.-निलेश खुपसे,जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना.