शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू

By admin | Updated: May 24, 2017 01:05 IST

बुलडाणा : सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात दोन विविध घटनांत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात दोन विविध घटनांत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सिंदखेडराजा : येथील आठवडी बाजाराजवळील मोठ्या बारवमध्ये २३ मे रोजी सकाळी ११ वाजता संतोष इश्वर संत्रे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संतोषने चपला बारवच्या दगडी पायऱ्यावर ठेवून कपड्यानिशी पाण्यात उडी मारली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी खेळणाऱ्या मुलांनी सांगितले; मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला की, आत्महत्या केली, याची चर्चा शहरामध्ये होती.बांधकाम मिस्त्री संतोष ईश्वर संत्रे (३२) हे २३ मे रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान आठवडी बाजाराजवळील बारवच्या पायऱ्यावर बसताना प्रत्यक्षदर्शिंंनी पाहिले. त्यांनी पाण्यात उडी मारली; परंतु त्यानंतर ते पाण्यात बुडाले. ही माहिती ठाणेदार संतोष नेमनार यांना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते बुद्दू चौधरी, राम आढावसह अनेकांनी पाण्यात उड्या मारुन शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र मृतदेह आढळला नसल्यामुळे नेमणार यांनी जालना-औरंगाबाद, बुलडाणा व अकोला येथील आपत्कालीन चमूला माहिती दिली. जालना येथील आपत्कालीन टीमचे फायरमन सुरज काळे, आर.बी.सोनार, उत्तम राठोड, शे.रशिद, नगर परिषद जालना यांच्या परिश्रमामुळे सुरज काळे यांना दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक पोलीस स्टेशनचे राजू घोलप, विठ्ठल मडावी, रमेश गोरे, प्रदीप वाघ, संतोष धंदर या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संग्रामपूर : तालुक्यातील निवाणा येथील एका ३० वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. गोपाल बळीराम उमरकर (वय ३०) असे मृत इसमाचे नाव असून, मृताचे भाऊ सागर बळीराम उमरकर यांनी तामगाव पोलिसात २३ मे रोजी फिर्याद दिली असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी १३/१७ नुसार मर्ग दाखल केला आहे.