शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी ...

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात

बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील २ ते ३ वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची स्थिती

राज्य सेवा परीक्षा चारवेळा पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मार्च २०२१ मध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल लागलेला नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही. आरटीओची पूर्वपरीक्षा होऊन दीड वर्ष झाले. अजूनही निकाल लागलेला नाही. सहा. वनसंरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग क च्या मंत्रालयीन पदांकरिता २ वर्षांपासून जाहिरात नाही. कर सहायक, महिला व बाल कल्याण अधिकारी या पदाकरिता तीन वर्षांपासून जाहिरात नाही. स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत ३,६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहेत. कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.

...............प्रतिक्रीया.........

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य

गत २०१६ पासून एमपीएससीची तयारी सरू केली. दहा दहा तास अभ्यास केला आहे. यंदा नक्कीच मेन्स क्लिअर होईल याचा आत्मविश्वास आहे. परंतु एमपीएससीने परीक्षेची तारीख काही जाहीर केली नाही. परिश्रम घेऊनही परीक्षाच हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.

-निकिता निरमल, विद्यार्थिनी

परीक्षा होत नसल्या तर मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची गरज आहे.

- सागर अवातीरक, विद्यार्थी

................बॉक्स.............

राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

मागील तीन वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांची नियुक्ती केली नाही. सध्या ६ पैकी २ सदस्य कार्यरत आहेत. मागील सरकारने आणि आताच्याही सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले आहे. दोनपैकी एक सदस्य लवकरच निवृत्त होणार आहे. त्याचा परिणाम एमपीएससीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांवर होत आहे.

एमपीएससीच्या परीक्षाच हाेत नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत़ काेराेनामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ सध्या आली आहे. या संचालकांच्या मार्गदर्शन केंद्रांचा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये सामावेश करावा व व्यावसायिक दर्जा प्राप्त करून द्यावा.

प्रा. डॉ. नितीन रामप्रसाद जाधव

संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र

१६ महिन्यांपासून सर्व खासगी क्लासेस, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सरकारच्या नियमानुसार बंद आहे, आम्ही सर्व शिक्षकांनी क्लासेस अभ्यासिका करीता हॉल भाड्याने, घरभाडे, कर्जाचे हप्ते हे मात्र सर्व चालूच आहे. त्याला लाकडाऊन नाही, काही शिक्षकांनी आपले फर्निचर विकले, ८० टक्के शिक्षकांनी हाॅल सोडून दिले, काही शिक्षकांनी भाजीपाल्याची, शेतात मजुरी, इ. कामे करून आपलं कुटुंब जगवत आहेत.

प्रा. दीपक चाटे, केंद्रसंचालक