शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!

By admin | Updated: May 24, 2017 01:07 IST

पार्डी येथील ग्रामस्थ आक्रमक: अधिकाऱ्यांसमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : मेहकर तालुक्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईसाठी बळी गेलेल्या महिलेच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.१९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार, उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. गावामध्ये ग्रामस्थांनीअधिकाऱ्यांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.माजी मंत्री सुबोध सावजी हे २२ मे रोजी पार्डी येथे होगे परिवाराच्या सांत्वनासाठी गेल्यानंतर त्यांना कोणताही अधिकारी साधी भेट देण्यासाठीसुद्धा पोहोचलेला नसल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी तेथूनच आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आदींना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करीत पाणीटंचाईची दाहकता कथन केली. त्यामुळे आयुक्तांनी दखल घेतल्याने जिल्हा प्रशासन खळबळून जागे होऊन उपविभागीय अधिकारी डॉ.अपार मंगळवारी पार्डी गावात पोहोचले होते. यावेळी गावकऱ्यांनी तप्त उन्हात डॉ. अपार यांना घेराव घालून उन्हातच उभे केले. अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर गावात पोलीस आले व तीन तासानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सोडले. पाण्यासाठी बायको मेली, आता मी फाशी घेतो!पाण्यासाठी बायको मेली, आता असे तरसू तरसू मारु नका, ही दोरी घ्या आणि एकदाच फाशी देऊन मारुन टाका, नाही तर मी फाशी घेतो, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी सहदेव होगे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. सहदेव घुगे यांच्या पत्नीचा १९ मे रोजी पाण्यासाठी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. सहदेव घुगे यांच्या मागणीने सर्व जण अवाक झाले होते. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- सुबोध सावजी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला असला तरी ही परिस्थिती निर्माण होण्याकरिता अधिकारी जबाबदार आहेत. गावात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई आतापर्यंत दूर करायला हवी होती; मात्र तसे न झाल्यामुळे महिलेच्या मृत्यूसाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.