शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

ऑगस्टमध्ये पावसाची ३९ टक्के तूट, आता सप्टेंबरमध्ये बरसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST

बुलडाणा: जून, जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी अधिक पडलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जिल्ह्यावर कृपाछत्र न ठेवल्यामुळे पावसाची जिल्ह्यातील ...

बुलडाणा: जून, जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी अधिक पडलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जिल्ह्यावर कृपाछत्र न ठेवल्यामुळे पावसाची जिल्ह्यातील तूट पुन्हा १३ टक्क्यावर पोहोचली आहे. दरम्यान एकट्या ऑगस्ट महिन्याचा विचार करता तब्बल ३९ टक्के पाऊस कमी पडला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

भारतीय हवामान खात्याने २ ऑगस्ट रोजी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाचा विस्तारीत अंदाज जाहीर केला होता. तो ऑगस्ट महिन्यात तंतोतंत खरा ठरला असून ऑगस्टमध्ये सरासरी पडणाऱ्या २०७.४ मिमी पावसाच्या तुलनेत अवघा १२६.८ मिमी पाऊसच जिल्ह्यात बरसला आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरीप हंगामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये पाऊस कसा पडतो यावर खरीपासोबतच रब्बीचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे.

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात पाऊस कमी पडल्यास ऑगस्टमध्ये हमखास दमदार पाऊस पडतो अशी पुर्वीपासूनची धारणा आहे. पण यावर्षी ती फोल ठरली. जवळपास तीन वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या अवघा ६१ टक्केच पाऊस झाला आहे.

--१ ते ९ सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस--

दुसरीकडे हवामान विभागाने सप्टेंबरमधील विस्तारीत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार १ ते ९ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सरासरीपेक्षाही पाऊस अधिक पडले असे सांगण्यात आले आहे. ऑगस्टच्या उर्वरित चार दिवसामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यमस्वरुपाचा तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हमखास दमदार पाऊस जिल्ह्यात पडेल असा अंदाज असल्याचे कृषी हवामान केंद्राचे हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे.

--प्रकल्पांमध्ये ४७ टक्केच जलसाठा--

जिल्ह्यातील ३ मोठ्या, सहा मध्यम व ८१ लघु प्रकल्पामध्येही क्षमतेच्या अवघा ४७ टक्केच जलसाठा आहे. बुलडाण्या सारख्या शहरालाही येत्या काळात दमदार पाऊस न पडल्यास डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे प्रकल्पातील जलपातळी वाढविण्यासाठी येत्या काळात दमदार पावसाची गरज आहेच.

--पाच तालुके प्रभावित-

कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुके प्रभावित झाले असून हे पाचही तालुके घाटाखालील भागातील आहे. जळगाव जामोद तालुक्या तर वार्षिक सरासरीच्या अवघा ३४ टक्के पाऊस झाला आहे. नांदुरा आणि मोताळा या दोन तालुक्यात किमान पक्षी ४७ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. शेगाव, मलकापूर या तालुक्यात ४५ टक्केही पाऊस झालेला नाही.

--तीन महिन्यात पडलेला पाऊस--

महिना पडणारा पाऊस प्रत्यक्ष पडलेला पाऊस टक्केवारी(-/ )

जून १३९.३ १३८.६ -०.५०

जुलै १९२.२ १९६.६ २.२९

ऑगस्ट २०७.४ १२६.८ -३८.८६