शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाला हवी गती!

By admin | Updated: November 24, 2014 00:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प रखडलेला, बुडीत क्षेत्रातील गावक-यांसमोर समस्यांचा डोंगर.

मानेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी जीवनदायी ठरलेल्या महत्त्वाकांक्षी अशा पूर्णा नदीवर होऊ घा तलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या २0 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कामाला गती देण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल व पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटेल; मात्र या प्रकल्पाचे भिजत घोंगडे पडले आहे. सुमारे ३५0 कोटींचा हा प्रकल्प आज ४५00 कोटींच्या वर गेला आहे; मात्र शासनस्तरावर कामाची गती पहिल्यास अजूनही कित्येक वर्ष या प्रकल्पाला लागतील, असे दिसत आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत एकंदर ४७ गावे बाधित क्षेत्रात येतात. यातील ३२ पूर्णत: तर १५ अंशत: बाधित होणार आहेत. अर्थात या ४७ गावांवर हे जिगाव धरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या वाताहतीमधून जणूकाही मरणच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बुडीत गावांना सद्य:स्थितीत गावे, घरे सोडून दुसर्‍या गावात, गावठाणात राहावयास जावे लागणार आहे. अनेक वेळा आंदोलने होऊनही शासन दरबारी विभक्त रेशनकार्डांंचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहे. अशा एक ना अनेक समस्या आजही बुडीत क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत आहेत. वास्तविक सिंचनाचा फार मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी जिगाव प्रकल्प हा महत्त्वपूर्ण असा प्रकल्प मानला जातो आणि भविष्यात तो होईल हे नक्की! पण आजतागायत गेल्या कित्येक वर्षांपासून बुडीत क्षेत्रात गावकरी व शेतकरी यांच्यासाठी पुनर्वसनाला गती नसल्याने हा प्रकल्प डोकेदुखी होऊन बसला आहे. प्रकल्पबाधित गावांमधील ग्रामसभेद्वारा निवडलेल्या अनेक गावठाणांचा प्रश्न अधांतरीच आहे. शासनस्तरावर याबाबत आजही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोपही अनेक गावांकडून होत आहे.