शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत केवळ तीन हजार घरे

By admin | Updated: November 7, 2014 23:29 IST

रमाई आवास घरकुल योजना; बुलडाणा जिल्ह्यात घरकुलांचे काम कासवगतीने

सिद्धार्थ आराख / बुलडाणा

        कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा यांनी मागील चार वर्षात रमाई आवास योजनेचे केवळ ३ हजार ४0१ घरे बांधली. सामाजिक न्याय विभागाने नुकताच चार वर्षांचा प्रगती अहवाल तयार केला असून, या अहवालात हे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात १२ हजार ३४४ घरांचे बांधकाम अद्याप पुर्णत्वाकडे गेले नाही. अजूनही ६ हजार ९१२ घरे प्रगती पथावर असल्याचे दाखविण्यात आले आहेत, तर ५ हजार ४३२ घरांच्या कामाला सुरूवातच झाली नाही. पर्यायाने या घरासाठी आलेला कोट्यवधी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या योजनेसाठी दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लाभार्थी घटकाकडून घरकुलांसाठी अर्ज मागवले जातात. या योजनेत मागील सन २0१0-११ आणि २0११-१२ या दोन वर्षात रमाई घरकुल योजनेसाठी ६९0 घरांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. यासाठी ४ कोटी ८0 लाख १५ हजार रुपयांची तरतूद शासनाने करून दिली होती. संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करीत या दोन वर्षात ६५७ घरांचे काम पुर्णत्वास नेले. यावर जवळपास ४ कोटी ६९ लक्ष ८९ हजार रुपये खर्च झाला. त्यामुळे जवळपास ६९0 बेघरांना आपले हक्काचे छत मिळाले. या लाभार्थ्यांना ४ कोटीचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर सन २0१२-१३ आणि २0१३-१४ या दोन वर्षात घरकुल बांधकाम मात्र अत्यंत कासव गतीने झाल्याचे अहवालावरून दिसते. या दान वर्षात दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आली नाही. २0१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षासाठी १५ हजार २0 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी १0५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती; मात्र दोन वर्षात १५ हजार घरांपैकी केवळ २ हजार ७४४ घरे पुर्णत्वाकडे गेले. यासाठी ९ हजार ५८८ लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना ४२ कोटी रुपये धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत शासनाने आता नव्याने तरतूद केली आहे. यापूर्वी एका घरकुलासाठी ७0 हजार रुपये अनुदान मिळत होते यामध्ये वाढ करून ती एक लाख रुपये करण्यात आली आहे. २0१४-१५ या वर्षासाठी जवळपास १0 कोटी ५0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. या घरकुलाच्या कामाला काही ठिकाणी सुरूवातही झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्हाभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून लाभार्थिंची निवडही करण्यात आली आहे.