शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

 मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:28 IST

राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

-  ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या पृष्टभूमीवर विद्यार्थ्यांमधील भाषा विषयाची प्रगती जाणून घेतली असता राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही  कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नची संस्कृती रुजली आहे. मात्र या इंग्रजी शाळांपुढे अनेक मुल आपल्या मायबोलीला विसरत असल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. अनेक मुलांना मराठीतील आकडे कळत नाहीत किंवा मराठी पुस्तकाचे वाचन करता येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विद्यार्थ्यांचे मुलभूत वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘असर’कडून केल्या जाते. मराठी व गणित विषयातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे अनेक धक्कादायक वास्तव ‘असर’च्या अहवालातून समोर आले आहेत.  २०१८ च्या शैक्षणिक सत्रामध्ये शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांची निवड करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे विश्लेषण केलेली माहिती या अहवालातून समोर आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ७० ते ८० शाळांची निवड करण्यात आली होती.  या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता व गणित या विषयाचे मुल्यांकन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तक वाचायला लावले असता अमरावती विभागातून अवघ्या ४४ टक्के मुलांनाच वाचन करता आले.  यामध्ये राज्यात एकूण ५५.५ टक्के मुलांचा समावेश आहे. तर नागपूर विभाग ५३.८ टक्के, नाशिक ५४ टक्के, कोकण ६०.८ टक्के, औरंगाबाद ४८.७ टक्के, पुणे विभागात ७१.७ टक्के मुलांना वाचता येते.  राज्यात वाचू न शकणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४५.५ टक्के आहे. वाचनामध्ये राज्याच्या तुलनेत अमरावती विभागच सर्वात खाली असल्याचे दिसून आले. ‘असर’च्या या माहितीमुळे भाषा विषयांची गंभीर परिस्थिती अमरावती विभागात आहे. 

बॉक्स.....राज्यातील सहावी ते आठवीच्या २३ टक्के मुलांना वाचता येईना!राज्यात इयत्ता तिसरी ते पाचवी प्रमाणे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. यामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मुल्यांकन केले असता राज्यातील २३ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे दिसून आले. त्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणाºया पुणे विभागात १४ टक्के मुले वाचू शकत नसल्याचे आढळून आले. तर वाचन करता येत असलेल्या मुलांची टक्केवारी पुणे विभागात ८६, नागपूर ७५.२, नाशिक ७५, औरंगाबाद ७३.९, अमरावती ७२.६, कोकण विभागात ८१.७ टक्के मुलांना वाचन करता आले. 

 विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील ठरावीक शाळा निवडण्यात आल्या होत्या. या चाचणीमध्ये तिसरी ते पाचवीच्या मुलांना पाहिलीचे व सहावी ते आठवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. अमरावती विभागात तिसरी ते पाचवीचे ४१ टक्के व सहावी ते आठवीचे ७२.६ टक्के विद्यार्थी वाचू शकल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ‘असर’ने नुकताच अहवाल दिला आहे. - डॉ. रविंद्र आंबेकर, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन