शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

 मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:28 IST

राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

-  ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या पृष्टभूमीवर विद्यार्थ्यांमधील भाषा विषयाची प्रगती जाणून घेतली असता राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही  कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नची संस्कृती रुजली आहे. मात्र या इंग्रजी शाळांपुढे अनेक मुल आपल्या मायबोलीला विसरत असल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. अनेक मुलांना मराठीतील आकडे कळत नाहीत किंवा मराठी पुस्तकाचे वाचन करता येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विद्यार्थ्यांचे मुलभूत वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘असर’कडून केल्या जाते. मराठी व गणित विषयातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे अनेक धक्कादायक वास्तव ‘असर’च्या अहवालातून समोर आले आहेत.  २०१८ च्या शैक्षणिक सत्रामध्ये शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांची निवड करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे विश्लेषण केलेली माहिती या अहवालातून समोर आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ७० ते ८० शाळांची निवड करण्यात आली होती.  या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता व गणित या विषयाचे मुल्यांकन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तक वाचायला लावले असता अमरावती विभागातून अवघ्या ४४ टक्के मुलांनाच वाचन करता आले.  यामध्ये राज्यात एकूण ५५.५ टक्के मुलांचा समावेश आहे. तर नागपूर विभाग ५३.८ टक्के, नाशिक ५४ टक्के, कोकण ६०.८ टक्के, औरंगाबाद ४८.७ टक्के, पुणे विभागात ७१.७ टक्के मुलांना वाचता येते.  राज्यात वाचू न शकणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४५.५ टक्के आहे. वाचनामध्ये राज्याच्या तुलनेत अमरावती विभागच सर्वात खाली असल्याचे दिसून आले. ‘असर’च्या या माहितीमुळे भाषा विषयांची गंभीर परिस्थिती अमरावती विभागात आहे. 

बॉक्स.....राज्यातील सहावी ते आठवीच्या २३ टक्के मुलांना वाचता येईना!राज्यात इयत्ता तिसरी ते पाचवी प्रमाणे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. यामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मुल्यांकन केले असता राज्यातील २३ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे दिसून आले. त्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणाºया पुणे विभागात १४ टक्के मुले वाचू शकत नसल्याचे आढळून आले. तर वाचन करता येत असलेल्या मुलांची टक्केवारी पुणे विभागात ८६, नागपूर ७५.२, नाशिक ७५, औरंगाबाद ७३.९, अमरावती ७२.६, कोकण विभागात ८१.७ टक्के मुलांना वाचन करता आले. 

 विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील ठरावीक शाळा निवडण्यात आल्या होत्या. या चाचणीमध्ये तिसरी ते पाचवीच्या मुलांना पाहिलीचे व सहावी ते आठवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. अमरावती विभागात तिसरी ते पाचवीचे ४१ टक्के व सहावी ते आठवीचे ७२.६ टक्के विद्यार्थी वाचू शकल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ‘असर’ने नुकताच अहवाल दिला आहे. - डॉ. रविंद्र आंबेकर, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन