शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 3:46 PM

मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला आहे.खामगाव तालुक्यातील शिर्ला परिसतील मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपूरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परसिरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिर्ला, कंचनपूर, बोथा, बोरी, अडगाव, आसा, दूधा, चिंचपूर, फतेपूर, गवंढाळा, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेडका, शहापूर अशा २१ गावांना पाणीपूरवठा करण्यात येतो. गतवर्षी सुरूवातीपासूनच अतिशय कमी पाऊस झाला. परिणामी नदी-नाल्यांना पूर गेले नाहीत. खरीपाचा हंगाम धोक्यात येण्याबरोबरच पिण्याचे पाण्याचे दर्भिक्ष्यही जाणवले. प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मन प्रकल्पाअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या २१ गावांची पाणी परिस्थिीतीही गतवर्षी अत्यंत बिकट बनली होती. परिसरात दुसरे कोणतेही पाण्याचे मोठे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या योजनेच्या भरवश्यावरच या परिसरातील नागरीकांची तहान आहे.परंतु यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सध्याच ५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी संपुर्ण पावसाळा संपुनही प्रकल्पात केवळ ३० टक्केच जलसाठा झाला होता. त्यामानाने यावर्षी सध्याच दुप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.परिणामी येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती नाही. परिसरातील नागरीकांना यावर्षी भरपूर पाण उपलब्ध राहणार आहे. वास्तविक पाहता, केवळ साडेसहा टक्के जलसाठ्याच्या भरवश्यावरच परिसरातील नागरिकांची तहान भागते. त्यामानाने यावर्षी प्रचंड जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

सिंचनासाठी उपलब्ध होणार पाणी!मन प्रकल्पावर २१ गावांची तहान अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पातून एरव्ही सिंचनासाठी देण्यात येणारे पाणी गतवर्षी बंद करण्यात आले होते. त्यामुळे रब्बीचे पिक घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना पिक वाचविताना कसरत करावी लागली होती. परंतु यावर्षी दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामासाठी शेतकºयांना प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर्षी निसर्गाने कृपा केल्याने सध्याच प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा झाला आहे. आणखी पावसाळा बाकी असल्याने जलसाठयात वाढच होईल. पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचाही प्रश्न मिटणार आहे.-चंद्रशेखर देशमुखशाखा अधिकारी, सिचंन शाखा शिर्ला.

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण