शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके ...

सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके वाचली आहेत. त्या पिकांसह पावसाचा अभाव असलेल्या उर्वरित भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडो हेक्टरवरील पिके करपून जात आहेत.

तालुक्यात २८ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. परिणामी तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यापश्चात २९ जूनला दमदार पाऊस बरसला. मात्र, तालुक्यातील पूर्वेकडील भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या भागातील शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित झाली. शेतजमिनी वाहून गेल्याने शेती निरूपयोगी ठरली. अनेक शेतात पाणी शिरल्यानेही मोठे नुकसान झाले. २९ जूनच्या पावसाने उर्वरित तालुक्याला मात्र दिलासा मिळाला. त्या पावसाने जमिनीत झालेल्या ओलीच्या भरवशावर बळीराजाने शिवारात चाड्यावर मूठ ठेवली; त्यामुळे सर्वत्र पेरणीचा बार उडविण्यात आला. त्या पश्चात आठ दिवस उलटत असतानाही पावसाचा एक टिपूस पडला नसल्याने जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरलेले पीक आता करपून जात आहे. यामध्ये सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेला कोवळा खरीप उन्हाच्या तडाख्याने होरपळू लागला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाची हीच स्थिती राहिल्यास दुबार पेरणी करावी तरी कशी, या विवंचनेत शेतकरी असून, या दोन-तीन दिवसात पावसाने कृपा केली तर ठीक, नसता संपूर्ण खरीप हातातून जाण्याची भीती आहे.

बळीराजा चिंताग्रस्त

तालुक्यात काही भागात खरिपातील पिकांची चांगली उगवण झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात डवरणी, निंदणीची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, पावसाने सलग आठ दिवस दडी मारल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतातील पिके पिवळी पडली आहेत. खरिपावर ओढवलेल्या या संकटात केवळ पाऊसच तारणहार ठरणार आहे. मात्र, पावसाकडून तसे संकेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दुबार पेरणीसाठी बियाणांची तजवीज करावी तरी कशी?

चिखली : तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी खरिपातील प्रमुख पीक सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर एवढे आहे. यासाठी लागणारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाणे सुरुवातीला उपलब्ध होते. मात्र, आता जर पेरण्या उलटल्या तर ऐनवेळी बियाणांचीही चणचण भासणार आहे. त्यातच सध्या सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. यामध्ये बियाणे १२ रुपये किलोपर्यंत आहेत. बियाणांचे हे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने शेतकरीवर्गात अस्वस्थता आहे.