शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

आगार निर्मितीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा

By admin | Updated: June 5, 2014 22:37 IST

नांदुरा तालुक्यात अडीच लाख लोकसंख्या असतानाही नांदुरा येथे आगार नाही.

नांदुरा : तालुक्यात अडीच लाख लोकसंख्या असतानाही नांदुरा येथे आगार नाही. नांदुरा येथे आगार निर्मिती १८ जुलै पुर्वी झाली नाही तर नांदुरा बसस्थानकासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन एकलव्य संस्थेने विभाग नियंत्रक बुलडाणा यांना दिले आहे.
आज नांदुरा बसस्थानकाहून सर्व बसफेर्‍या ह्या जळगाव, मलकापूर, खामगाव व बुलडाणा बसस्थानकातुन येतात त्या बसफेर्‍यांवर प्रवाशी वर्गाची वाहतुक आधारीत आहे. मात्र ह्या बसफेर्‍या अपुर्‍या पडतात. तर खासगी वाहनातील प्रवास महागडा, त्रासदायक व जिवघेणा ठरत आहे. नांदुरा ते जळगाव ११५, नांदुरा ते खामगाव १00, नांदुरा ते मलकापूर ९0, नांदुरा ते मोताळा ७0 व ग्रामीण भागातून शहरात सुमारे चारशे ऑटोरिक्षा ही खासगी वाहने आज रोजी प्रवाशी वाहतुक करतात. त्यांच्या तुलनेत बसफेर्‍या अत्यल्प आहेत. आगार निर्मितीसाठी लागणारी जागा, परिसर व सर्व सोयी उपलब्ध आहेत.पन्नास हजार हेक्टर क्षेत्रफळ असणार्‍या या तालुक्यासाठी बसचे आगार नसल्याने ग्रामीण भागात बसफेर्‍या पोहचत नाही व त्याचा फायदा घेवून खासगी प्रवाशी वाहने प्रवाशांची आर्थिक लुट करीत आहेत. त्यामुळे अस्वस्थ होवून एकलव्य संस्थेने शहरात आगार निर्मिती झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचे निवेदन विभाग नियंत्रकांना दिल्याने नांदुरा येथे बस आगार निर्मितीचा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चिल्या जात आहे.