शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

‘ए’ ग्रेडच्या डाळिंबाला ‘लो’ ग्रेडचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:51 IST

डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0  रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो  म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्‍यांना  डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी  ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६  हजार ७५0 रुपयेच मिळत आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च दु प्पट झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सा पडले आहेत. 

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट डाळिंबाचे दर पोहोचले सात रुपयांवर!  डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडले

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0  रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो  म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्‍यांना  डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी  ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६  हजार ७५0 रुपयेच मिळत आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च दु प्पट झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सा पडले आहेत. आधुनिक शेतीची कास धरत शेतकरी फळबाग  घेण्याकडे वळले आहेत. फळबागेमध्ये डाळिंब शेतीचे  क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील ७३ हजार २७  हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखाली येते. त्यापैकी सुमारे ४१  हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब उत्पादनाखाली आहे. त्यापासून  ४ लाख १0 हजार मे.टन इतके उत्पादन राज्यभरातून घे तले जाते. डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे,  सांगली, सोलापूर, या जिल्ह्यांपाठोपाठ आता वाशिम व  बुलडाणा जिल्ह्यातही होत आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये  बुलडाणा, चिखली, मेहकर, संग्रामपूर, जळगाव जामोद  या तालुक्यातील काही भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले  जाते. डाळिंबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त  आहे. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार हो तात. मोठे व चांगल्या प्रतीच्या फळांना ‘ए’ ग्रेड मिळत असून,  त्यानुसार त्याला भावही प्रतिकिलो १00 रुपयांच्यावर  राहतो. गेल्यावर्षी १४0 रुपये किलोने विकल्या जाणार्‍या  डाळिंबाची यावर्षी केवळ ७ रुपये किलोने शे तकर्‍यांकडून खरेदी केली जात आहे. डाळिंबाची  लागवड केल्यानंतर पहिला बार येईपर्यंत शेतकर्‍यांना   १७ महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर फळधारणा  होते. परंतु, यादरम्यान शेणखत, छाटणी, रासायनिक ख त देणे, फवारणी, मजुरी आदींसाठी जवळपास ८५ हजार  रुपये एकरी खर्च लागतो. त्यानंतर एका एकरामध्ये जवळपास ५ हजार २५0 किलो  उत्पादन होतो, या उत्पादनाला सध्या ७ रुपये प्र ितकलोचा भाव मिळत असल्याने एक एकरामध्ये ३६  हजार ७५0 रुपयांचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती येत  आहे.डाळींबाला भाव कमी मिळत असल्याने उत्पन्नापेक्षा उत् पादनाचा खर्च दुप्पट होत असल्याने डाळींब उत्पादक  शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडलेएका एकरामध्ये शेतकर्‍यांना डाळिंबाचे सरासरी ५ हजार  २५0 किलो उत्पादन पहिल्या टप्प्यात होत आहे. सध्या  सात रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यासाठी ८५  हजार रुपये खर्च येत असून, ३६ हजार ७५0 रुपयांचे  होत असल्याने शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यातील उत् पादनातून ४८ हजार २५0 रुपयांची झळ सोसावी लागत  आहे. कमी भावामुळे डाळिंबाची शेती तोट्यात गेल्याने  डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडले आहे.

डाळिंबावर २६ वेळा फवारणीएका एकरामध्ये डाळिंबाचे ३५0 झाडे लागतात; परंतु  कीड व रोगापासून डाळिंबाला वाचविण्यासाठी फवारणी  महत्त्वाची आहे. त्यासाठी पहिल्या वेळची फळधारणा  होईपर्यंत जवळपास २६ वेळा फवारणी करावी लागत  असून, एका फवारणीला दोन हजार रुपये खर्च शे तकर्‍यांना येत आहे. त्यामुळे डाळिंबाच्या शेतीसाठी  एकूण फवारणीवर ५२ हजार रुपये खर्च शेतकर्‍यांचा  होत आहे. डाळिंबाच्या उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक  आहे. 

१४0 रुपये भाव मिळणार्‍या डाळिंबाची सध्या मातीमोल  भावाने विक्री करावी लागत आहे. डाळिंबाचे उत्पादन  घेण्यासाठी ८५ हजार रुपये खर्च येत आहे; मात्र त्या  तुलनेत भाव मिळत नाही. सध्या केवळ सात रुपये प्र ितकिलोने डाळिंब विक्री करावी लागत असल्याने  डाळिंब शेतीत शेतकर्‍यांना तोटाच सहन करावा लागत  आहे.- दिनकर गायकवाड, डाळिंब उत्पादक, पळसखेड  दौलत.